Chanakya Niti : मानवाला आजच्या जीवनात आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथात सांगितलेली अनेक धोरणे उपयोगी पडत आहेत. आचार्य चाणक्य यांनी जीवनात सफल होण्याचे काही मार्गही त्यांच्या ग्रंथात सांगितले आहेत. त्याचा अवलंब करून नक्कीच जीवनात यशस्वी व्हाल.
आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक जीवनातील स्त्री-पुरुषांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच सुखी जीवन जगण्याचेही मार्ग आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितले आहेत.

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक किंवा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काही लोकांपासून नेहमी सावध राहण्याचे सल्ले दिले आहेत.
प्रत्येकाला वाईट काळाची भीती वाटते. जगातील कोणत्याही व्यक्तीला त्याच्यावर वाईट वेळ यावी असे वाटणार नाही. यासाठी आचार्य चाणक्यांची धोरणे प्रभावी ठरू शकतात. चाणक्याच्या मते, जर आपल्या काही सवयींमध्ये थोडासा बदल केला तर माणूस नेहमी यशाची शिडी चढत जातो.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनुष्यामध्ये संयम असणे गरजेचे आहे. कोणतेही आव्हान आणि परिस्थिती आली तरी धीराने सामोरे गेले तर त्यावर सहज मात करता येते. शांतपणे कोणताही निर्णय घेतल्याने तो चुकत नाही.
एखादी व्यक्ती घाबरून चुकीचे निर्णय घेते आणि नंतर त्याला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागतो. जीवनात सुख-दु:ख येतच राहतात. अशा परिस्थितीत माणसाने नेहमी आपल्या भीतीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. घाबरून न जाता परिस्थितीला सामोरे जावे.
कोणतेही काम करण्यापूर्वी योजना आखली तर ती व्यक्ती कधीही अपयशी होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भविष्याचे नियोजन केले पाहिजे. याच्या मदतीने माणूस प्रत्येक आव्हानाला सहज सामोरे जाऊ शकतो.