Balasaheb thorat : आज काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला. यामुळे एकच खळबळ उडाली. यावर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, भाजपला स्वतःच्या ताकदीवर काही मिळवता आलेले नाही. त्यामुळे काँग्रेसमधील माणसे किती फुटतात तेवढे ते फोडतात.
भाजपचा प्रत्येक गोष्टीमध्ये हात असतो, असे सूचक विधान त्यांनी केले. थोरात यांनी अन्याय झाला असे म्हटले असेल तर हायकमांड या प्रकरणाची चौकशी करेल. भाजपला स्वतःच्या ताकदीवर काही मिळवता आले नाही. त्यामुळे काँग्रेसमधील माणसे किती फुटतात तेवढे ते फोडत असतात, असेही ते म्हणाले.

दरम्यान, सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य काँग्रेस कमिटीमध्ये मोठी घुसपुस सुरू होती. नाशिक मतदारसंघात कोणाला उमेदवार देयची यावरून हा वाद सुरू झाला होता.
काँग्रेसने सत्यजीत यांचे वडील सतीश तांबे यांना तिकीट दिले होतं. पण त्यांनी फॉर्म भरलाच नाही. अखेर सत्यजीत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. सत्यजीत निवडून देखील आले होते. यानंतर थोरात विरुद्ध पटोले हा वाद समोर आला होता. पटोलेंबरोबर काम करणं शक्य नाही असे थोरात यांनी पत्र लिहून हायकमांडला कळवले होते.
असे असताना आता थोरात त्यांनी थेट विधिमंडळ पक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाळासाहेबांच्या राजीनाम्यासंदर्भात माहिती नसल्याचे सांगितले आहे. आता त्यांच्या राजीनाम्यावर हायकमांड काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल. मात्र काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का आहे.