UPSC Interview Questions : जेव्हा जगातील सर्वात कठीण परीक्षांचा विचार केला जातो, तेव्हा IAS परीक्षेची त्या यादीतील टॉप 10 मध्ये गणना केली जाते. लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा त्याची मुलाखत क्लिअर करणे अधिक कठीण मानले जाते.
या परीक्षेच्या मुलाखतीत प्रश्न विचारण्याचा कोणताही विशिष्ट पॅटर्न नसल्याने उमेदवारांची क्षमता तपासण्यासाठी कुठूनही प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये असे अनेक अवघड प्रश्न आहेत, जे तुमच्या मनाला चक्रावून टाकतील.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. म्हणूनच UPSC मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांविषयी तुम्हाला ज्ञान असणे तुम्हाला आवश्यक आहे.
म्हणूनच येथे आम्ही तुम्हाला UPSC (IAS) मुलाखतीत विचारलेल्या अशाच काही अवघड प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांची माहिती देत आहोत. हे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुम्हाला या अवघड प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची याची थोडीशी कल्पना येईल.
प्रश्न : दुधाचे दही होणे यास कोणता बदल म्हणतात?
उत्तर : नैसर्गिक बदल
प्रश्न : कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे?
उत्तर : २८२ किमी
प्रश्न : कोल्हापूर – पणजी महामार्गावर कोणता घाट जातो?
उत्तर : फोंडा घाट
प्रश्न : डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकूण किती समित्यांचे सदस्य होते?
उत्तर : दहा
प्रश्न : नील- आर्मस्ट्रॉंग यांच्या पायाच्या बुटाचे ठसे किती वर्षापर्यंत चंद्रावर राहू शकतात?
उत्तर : ५० लाख वर्ष
प्रश्न : ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य कशापासून घेण्यात आले आहे?
उत्तर : मुंडक उपनिषेद