UPSC Interview Questions : यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे ही देशातील लाखो तरुणांची इच्छा असते. पण तीन टप्पे पूर्ण न करता आल्याने अनेकांची ही इच्छाच बनून राहते. नागरी सेवा परीक्षेतील मुलाखत फेरीला अनेक किचकट प्रश्न विचारले जातात.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

जिथे प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह, मुख्य परीक्षा सब्जेक्टिव्ह आणि मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता वाढते.
या परीक्षेत किंवा मुलाखतीत असे अनेक विचारले जातात ज्यामुळे उमेदवार बुचकळ्यात पडतात. अशा वेळी आम्ही तुम्हाला असेच काही प्रश्न सांगणार आहोत, ज्याची उत्तरे तुम्हाला येतात का हे नक्की तपासून पाहा.
प्रश्न : प्रजासत्ताक दिनी २१ तोफांची सलामी कोणाला दिली जाते?
उत्तर : राष्ट्रपती
प्रश्न : तात्या टोपे यांना कोणत्या ठिकाणी फाशी देण्यात आली होती?
उत्तर : क्षीप्री
प्रश्न : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर : नागपूर
प्रश्न : ‘पवनार आश्रम’ कोणत्या नदीकाठी उभारण्यात आले आहे?
उत्तर : धाम
प्रश्न : महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते आहे?
उत्तर : मुंबई विद्यापीठ
प्रश्न : कृषी क्षेत्रातील ‘रजत धागा क्रांती’ ही कशाशी संबंधित आहे?
उत्तर : अंडी