Maharashtra News : धनगर आरक्षणप्रश्री चोंडीत चालू असलेल्या आंदोलनाकडे आज सहाव्या दिवशीही सरकार दुर्लक्ष करत असून, हे सरकार निर्दयी सरकार असल्याचेच यातून दिसून येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगत, संसदेच्या विशेष अधिवेशनात इंडिया आघाडीच्या वतीने धनगर आरक्षणप्र श्री आवाज उठवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुळे यांनी सोमवारी रात्री साडेआठ वाजता चौंडीत येवून धनगर आरक्षणप्रश्री उपोषणास बसलेल्या आंदोलकांची भेट घेवुन चर्चा केली. या वेळी खा. सुळे यांनी तब्बल एक तास आंदोलकांशी चर्चा केली.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/09/ahmednagarlive24-saZX.jpg)
यादरम्यान आ. रोहित पवार हेही आंदोलनस्थळी आले. या वेळी महाविकास आघाडीच्या मुंबईत चालु असलेल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा विषय चर्चेत घेण्याबाबत खा. सुळे यांनी महाविकास आघाडीचे नेते राजेश टोपे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली.
तर आ. रोहित पवार यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याशी फोनवर चर्चा करून, आंदोलकांची प्रकृती खालावली असल्याने, शासनाने या आंदोलनाची दखल घेण्याबाबत कळवावे, असे सांगितले.
या वेळी धनगर आरक्षणप्रश्री खा.सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवण्याबरोबरच व्टिट करून लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण चालू असतानाही सरकारमधील जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा अन्य कोणीही मंत्री आंदोलकांकडे फिरकले नसल्याबाबत खा. सुळे यांनी आश्चर्य व्यक्त करत, याबाबत जाब विचारला जाणार असल्याचे सांगितले.
भाजपा सरकार राज्यात एक आणि केंद्रात वेगळीच भूमिका घेताना दिसत आहे. संसदेत धनगर आरक्षणाचा प्रश्र मांडला तर भाजपाचेच खासदार आरक्षण देण्यास विरोध करतात, त्यामुळे धनगर आरक्षणप्र श्री भाजपाने भूमिका स्पष्ट करावी, असेही आवाहन खा. सुळे यांनी या वेळी केले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या राजपत्रात ३६ क्रमांकावर धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण असल्याचा उल्लेख आहे. या राजपत्राची प्रत या वेळी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी खा. सुळे यांना दिली.
उपोषण मागे घेण्याबाबत खा. सुळे यांनी आंदोलकांना विनंती केली. मात्र, उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले, अण्णासाहेब रूपनवर आणि सुरेश बंडगर यांनी जोपर्यंत धनगर आरक्षणाचा वटहुकुम निघत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही आणि वैद्यकिय उपचारही घेणार नसल्याचे सांगितले.