शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी / संपाच्या इशाऱ्यामुळे गुरूवारी कांदा लिलाव राहणार बंद…!

Published on -

Ahmednagar News : वाहतुकदार संघटनेने दिलेल्या संपाच्या इशाऱ्यामुळे नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातील कांदा लिलाव गुरुवारी (दि.११) बंद ठेवण्याचा निर्णय दि अहमदनगर फळफळावळ व आडत्यांचे असोसिएशनने घेतला आहे.

तसे पत्र त्यांनी बाजार समिती प्रशासनाला दिले असल्याने शेतकऱ्यांनी गुरुवारी आपला कांदा विक्रीसाठी नेप्ती उपबाजारात न आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूकदार संघटनेने दिलेल्या संपाच्या इशाऱ्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला शेतीमाल परराज्यात पाठविण्यासाठी वाहने उपलब्ध होणार नाहीत, म्हणून गुरुवारी (दि.११) कांदा लिलाव बंद ठेवण्याबाबतचे पत्र दि अहमदनगर फळफळावळ व आडत्यांचे असोसिएशनने सोमवारी (दि.८) बाजार समिती प्रशासनाला दिले आहे.

या मागणीचा विचार करून गुरुवारी होणारे कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुरुवारी आपला कांदा विक्रीसाठी नेप्ती उपबाजारात आणू नये असे आवाहन सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ व सचिव अभय भिसे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe