Ahmednagar News : झाडावरील पेरू तोडल्या कारणावरुन श्रीरामपूर शहरातील मोरगेवस्ती परिसरात दोन गटात दगडफेक होवून चाकूने वार केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी येथील शहर पोलिसांनी काल मंगळवारी (दि.१३) सहा ते सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात राहणारे आशा उईके या त्यांच्या पुतण्यांसोबत रेशन घेवून घरी परतत असताना, मोरगेवस्ती येथील गणपती मंदिर टॉवर रोड परिसरात पप्पु शेटे

यांच्या घराजवळ रोडवर त्यांचा भाचा सत्या उईके याने खाली पडलेला पेरु खाण्यासाठी उचलला. परंतू अरफान शेख याने झाडावरुन पेरु तोडला, असा गैरसमज करुन त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली.
तेव्हा त्यांची पुतणी जयनी उईके हिने त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांचे काही ऐकून न घेता हरभजन उईके यास जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकुने वार करुन पाठीवर खुपसला. दरम्यान
या वादात अँन्थोनी उईके याने मध्यस्थी केली. परंतु त्याचाही राग आल्याने तो उगरलेला चाकू अॅन्थोनी यांस हातावर लागून दुखापत झाली आहे. तसेच हुजैप शेख याने त्याच्याकडील लोखंडी रॉडने जयनी उईके, दिपीका उईके यांना डोक्यावर, कपाळावर मारुन दुखापत केली.
तसेच फिरोज फिटरवाला त्याच्यासोबत इतर ४ ते ५ अनोळखी साथीदारांनी सागर उईके यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्याकडील दगड फेकून मारुन आशा उईके यांना त्यांच्या आदिवासी समाजावरुन जातीवाचक शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी आशा अंजेश उईके यांनी येथील शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अरफान शेख, हुजैप शेख, फिरोज फिटरवाला व इतर ४ ते ५ अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.