महाराष्ट्रात ११ लाख टन सोयाबीनची हमीभावाने खरेदी

Sushant Kulkarni
Published:

८ फेब्रुवारी २०२५ मुंबई : महाराष्ट्रात इतर सर्व राज्यांपेक्षा सर्वात जास्त सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यात आल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी दिली.६ फेब्रुवारी २०२५ अखेर राज्यात ५ लाख ११ हजार ६५७ शेतकऱ्यांकडून ११ लाख २१ हजार ३८५ मे. टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली असल्याचे रावल यांनी सांगितले.सोयाबीन खरेदी करण्यासाठीची मुदत गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी संपली.

त्यामुळे सोयाबीन खरेदी केंद्रे बंद करण्यात आली होती.मात्र सोयाबीन खरेदीला आणखी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. परंतु आणखी मुदतवाढ मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.सोयाबीन ठेवण्यासाठी गोदामांची साठवणूक क्षमता पूर्ण झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

सोयाबीन खरेदीसाठी १ ऑक्टोबर २०२४ पासून ऑनलाइन शेतकरी नोंदणी सुरू करण्यात येऊन १५ ऑक्टोबर २०२४ पासून प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ९० दिवसांची मुदत १२ जानेवारी २०२५ पर्यंत होती.

मात्र शेतकरी नोंदणीचे प्रमाण विचारात घेऊन खरेदी प्रक्रियेस केंद्र शासनाच्या मान्यतेने प्रथम ३१ जानेवारी २०२५ पर्यंत आणि दुसऱ्यांदा ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. शेतकऱ्यांची मागणी असली तरी आता आणखी मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशात सर्वाधिक खरेदी; आता मुदतवाढ नाही

रावल यांनी सांगितले १ की, खरेदी केलेला सोयाबीन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या ३४५ गोदामात, तसेच भाडेतत्त्वावरील २५२ खासगी गोदामांत साठवण्यात आला आहे.या हंगामात सोयाबीन खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याने गोदामांची साठवणूक क्षमता पूर्ण झाली आहे.

केंद्र शासनाने सन २०२४-२५ करिता २ सोयाबीनसाठी प्रति क्विटल ४८९२ रुपये इतका हमीभाव घोषित केला असून तो मागील वर्षाच्या हमीभावापेक्षा २९२ रुपये प्रति क्विटलने जास्त आहे.नाफेड व एनसीसीएफ या केंद्रीय नोडल एजन्सी अंतर्गत सहा राज्यस्तरीय नोडल एजन्सी मार्फत शेतकरी नोंदणी व खरेदी प्रक्रिया राबवण्यात आली असून त्यासाठी नाफेडद्वारे ४०३ व एनसीसीएफद्वारे १५९ अशी एकूण ५६२ केंद्रांवर खरेदी करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe