काळ्याबाजारात धान्याची विक्री; मुद्देमालासह चार आरोपी अटकेत

Published on -

१ मार्च २०२५ जामखेड : गरिबांच्या हक्काचे रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना जामखेड शहरातील जांबवाडी रोडवरील स्मशान भूमी जवळ पकडली. यात ९०० रुपयांच्या पिकअप ५५ हजार ४३ धान्याच्या गोण्या व एक पांढऱ्या रंगाची पिकअप असा २ लाख ५५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पिकअप चौघांविरोधात चालकासह जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश पोपट मोहा), विष्णू बांगर (रा. टकले, अशोक टकले (पूर्ण नाव माहीत नाही, दोघे रा. बटेवाडी) व वाहनचालक लखन सतिश क्षीरसागर (रा. साकत फाटा) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.२४ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास वाहन चालक लखन सतिश क्षीरसागर हा पांढऱ्या रंगाच्या पिकअप (क्र. एमएच-१२, एमव्ही ७२४३) मधून रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन चालला होता.

ही माहिती तहसीलदार गणेश माळी यांना समजली. त्यांनी तातडीने पथकासह या वाहनाचा पाठलाग केला. हे वाहन नगर रोडकडून शासकीय विश्रामगृहाच्या समोरून विंचरणा नदीच्या जुन्या पुलावरून जांबवाडी रोडकडे जात असताना तहसीलदार माळी यांनी ते थांबवून त्याची तपासणी केली.

यावेळी त्यांना पिकअपमध्ये तांदुळाचे ४३ गोण्या मिळून आल्या. या गोण्यांवर गव्हन्र्मेन्ट ऑफ पंजाब असे नाव होते. यानंतर सदरचे वाहन व धान्य पकडून जामखेड पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी शासकीय धान्य गोदामाचे गोदामपाल बाळू भोगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe