SSC HSC Exam Results Date 2025 : महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षा आता लवकरच संपणार आहेत, दरम्यान राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला या परीक्षांचा निकाल यंदा अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर केला जाणार आहे.
निकाल प्रक्रियाही गतीमान
शिक्षण मंडळाने या वर्षी निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करत, 15 मेपूर्वीच निकाल प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणाच्या आणि करिअरच्या योजनांसाठी अधिक वेळ मिळणार आहे. मागील काही वर्षांमध्ये दहावी आणि बारावीचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केले जात होते, मात्र यंदा परीक्षा लवकर घेतल्यामुळे निकाल प्रक्रियाही गतीमान करण्यात आली आहे.

उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेत वेग
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यंदा उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेतही वेग वाढवला आहे. परीक्षा पूर्ण होताच लगेचच उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात करण्यात आली आहे, जेणेकरून अंतिम गुणांकनाचे काम वेळेत पूर्ण होईल. मिळालेल्या माहितीनुसार,बारावीचा निकाल 10 मेच्या आसपास आणि दहावीचा निकाल 15 मेपूर्वी जाहीर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेसाठी वेळेत अर्ज करता येणार आहे.
सर्वात वेगवान निकाल
राज्य शिक्षण मंडळाच्या इतिहासात हा सर्वात वेगवान निकाल ठरू शकतो. जर निकाल निश्चित वेळेत प्रसिद्ध झाला, तर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, पुनर्परीक्षा आणि उच्च शिक्षणाच्या संधींसाठी अधिक वेळ मिळणार आहे. नुकतीच याबाबत माहिती देण्यात आली असून, निकाल १५ मेपूर्वी जाहीर करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. परीक्षांचा अंतिम टप्पा पूर्णत्वास येत असतानाच निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
ह्या तारखेला लागणार निकाल
राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, “मंडळाने यंदा निकालाची प्रक्रिया वेगवान करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षांचे वेळापत्रक आणि निकाल प्रक्रिया वेळेच्या आधीच पार पडण्याची शक्यता असून, त्यासाठी उत्तरपत्रिकांची तपासणी सध्या वेगात सुरू आहे. साधारणतः बारावीचा निकाल १० मेपर्यंत, तर दहावीचा निकाल देखील लवकर घोषित केला जाऊ शकतो. या निर्णयामागे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अधिक पुरेसा वेळ मिळावा हा प्रमुख उद्देश असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सोपी
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार असून, निकालाची वेळ कमी झाल्याने यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सोपी होणार आहे. विशेष म्हणजे, जर हे निकाल १५ मेपूर्वी लागले तर मंडळाच्या इतिहासातील हा सर्वांत जलद जाहीर झालेला निकाल असेल. पूर्वीच्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निकालासाठीचा कालावधी खूपच कमी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, पुरवणी परीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा निर्णयही शिक्षण मंडळाने घेतला आहे.
पुरवणी परीक्षा जुलै…
सध्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, निकालाची तारीख निश्चित करण्यासाठी मंडळ अधिकारी कसोशीने काम करत आहेत. विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष आता निकालाच्या तारखेवर केंद्रित झाले असून, मंडळाच्या या हालचालींचा फायदा लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबाबत माहिती दिली असून, विद्यार्थ्यांना निकालानंतरच्या पुढील प्रवेशांसाठी याचा लाभ होणार आहे. पुरवणी परीक्षा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्याची योजना आहे.