अहिल्यानगर : लग्न म्हणजे दोन जिवांचे, दोन कुटुंबांचे मिलन मात्र बदलत्या काळानुसार आता ही संकल्पना देखील बदलत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. कारण आता शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही खर्चिक विवाह सोहळे होत आहेत. दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे लग्न, साहित्याच्या किमतीही गगनाला भिडल्या असून, सोने, चांदीच्या दागिन्यांवर ही महागाईचे सावट आहे, असे असले तरी कर्ज काढून धुमधडाक्यात लग्न सोहळे साजरे केले जात आहेत. त्यामुळे अनेकांवर कर्जाचा डोंगर वाढत असल्याचीवस्तुस्थिती पहावयास मिळत आहे.
ग्रामीण भागात शेतमजूर व गरीब कुटुंबांना आपल्या मुला मुलींच्या लग्नासाठी दोन पैसे गाठीला जोडावे लागतात. परंतु, वाढत चाललेल्या महागाईमुळे, लग्नसोहळ्यातील वाढलेल्या खर्चामुळे अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. पूर्वी ग्रामीण भागातील विवाह सोहळे कमी खर्चात साध्यासुध्या पद्धतीने पार पाडले जात होते. अलिकडे ग्रामीण भागातही शहरी थाटामाटाची संस्कृती रूढ होत चालली आहे. लग्न सोहळयात मेहंदी, हळद, पाहुण्यांचा पाहुणचार, कपडे, स्वागत समारंभ,भेटवस्तू बँडबाजा, डि.जे.,लाइटिंग, एलईडी स्क्रीन व शेवटी मांडव वाढवणी आदि कार्यक्रमासह खर्चाची यादी वाढली आहे.
याशिवाय घोडा, केटर्स, फेटे, डेकोरेशन, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी, ड्रोन कॅमेरा, शूटिंग खर्च यांची एकूण गोळाबेरीज केली तर खर्च लाखोंच्या घरात जातो. त्यामुळे लग्न थाटामाटात व वेगळ्या पद्धतीने वाजत, गाजत झाले पाहिजे असा आताच्या तरुण पिढीचा आग्रह घरच्यांसमोर असतो, त्यामुळे सर्वसाधारण घरातील लग्नाचे बजेट वाढत चालले आहे. शहरात होणाऱ्या महागड्या लग्नांसारखी लग्न अलीकडे ग्रामीण भागातही व्हायला सुरुवात झाली आहे. परिणामी आई, वडिलांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
अलिकडे अनेक धार्मिक, सामाजिक संस्था सामाजिक बांधिलकीतून सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करतात. सर्वांचा खर्च,वेळ, पैसा व श्रम यांची तर बचत होतेच. शिवाय सामाजिक संस्थांकडून विवाहीत जोडप्यांना संसाराकरिता आवश्यक साहित्यही दिले जाते. गोरगरीब, शेतकरी व सर्वसाधारण पालकांना सामुहिक विवाह सोहळ्यांमुळे मोठी मदत होते. आर्थिक कर्जबाजारीपणातून वाचण्यासाठी सामूहिक विवाह
