स्टेट बँक ऑफ इंडियाची 400 दिवसांची एफडी योजना गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत ! गुंतवणुकीसाठी फक्त या तारखेपर्यंत संधी

स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. या बँकेच्या 400 दिवसाच्या स्पेशल FD योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 7.10% दराने आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.60 टक्के दराने परतावा दिला जात आहे.

Published on -

SBI FD Scheme : स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी विविध कालावधीच्या एफडी योजना सुरू करत आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना बँकेकडून चांगला जोरदार परतावा दिला जातोय. स्टेट बँक ऑफ इंडिया सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची एफडी योजना ऑफर करत असून बँकेकडून काही विशेष FD योजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया ने 400 दिवसांची विशेष एफडी देखील सुरू केली आहे. त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सामान्य एफडी योजनेच्या तुलनेत अधिकचा परतावा दिला जातोय. दरम्यान आज आपण एसबीआयच्या चारशे दिवसाच्या FD योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

400 दिवसांची FD योजना कशी आहे?

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अमृत कलश एफडी योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा कालावधी 400 दिवसांचा आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 31 मार्च 2025 ही शेवटची तारीख आहे.

म्हणजेच या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांकडे फक्त चार दिवसांचा काळ बाकी आहे. अमृत कलश FD योजना ही आतापर्यंतची सर्वात कमी कालावधीची स्पेशल FD योजना आहे.

या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 7.10% दराने परतावा दिला जात असून याच योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना म्हणजे 60 वर्षांवरील ग्राहकांना 0.50% अधिकचे व्याज दिले जात आहे अर्थातच 60 वर्षांवरील नागरिकांना या एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास 7.60% दराने परतावा मिळणार आहे.

या योजनेत गुंतवणूकीची शेवटची तारीख वारंवार बदलली जात आहेत. पण, सध्या तरी तुम्ही 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करु शकता. आता आपण या योजनेत दोन लाखाची गुंतवणूक केल्यास किती व्याज मिळणार याच कॅल्क्युलेशन समजून घेऊयात.

दोन लाखाच्या गुंतवणुकीवर मिळणार इतके रिटर्न

जर तुम्ही एसबीआयच्या अमृत कलश एफ डी योजनेत 2 लाख रुपये गुंतवले तर सामान्य ग्राहकांना चारशे दिवसानंतर तुम्हाला 7.10 टक्के दराने 14,200 रुपये परतावा मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना यापेक्षा जास्त परतावा मिळणार आहे.

त्यामुळे या योजनेतील गुंतवणूक ही तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. जर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी उत्तम ऑप्शन आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe