उपमुख्यमंत्र्यांच्या अश्वासनानंतर श्रीगोंद्यातील आंदोलन स्थगित: बारा दिवस सुरू होते भजन कीर्तन आंदोलन

Updated on -

अहिल्यानगर : श्रीगोंदा येथील संत श्री शेख महंमद महराज मंदिर जीर्णोद्धार आणि वक्फकडे केलेली नोंदणी रद्द करण्यासाठी सुरू केलेले आंदोलन बाराव्या दिवशी स्थगित करण्यात आले, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मुख्यमंत्री यांची वेळ घेतली असल्याचे सांगितले तर अक्षय महाराज शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रश्नासाठी वेळ दिली असून, आठ दिवसांत याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्याने रात्रीच्या कीर्तननंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले श्रीगोंदा येथील संत श्री शेख महंमद महराज मंदिर जीर्णोद्धार आणि वक्फकडे केलेली नोंदणी रद्द करण्यासाठी दि.१७ एप्रिल पासून गाव बंद तहसील समोर धरणे आंदोलन कीर्तन ,भजन कार्यक्रम सुरू करणे होते. यात बाराव्या दिवशी प्रशासनाने निवेदन स्वीकारले अप्पर तहसीलदार प्रवीण मुदगल यांनी निवेदन जिल्हाधिकारी यांना पाठवले असल्याचे सांगत.जो अवधी गेला त्या बद्दल प्रशासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली.

दिलेले निवेदनातील मुद्दे जिल्हाधिकारी कार्यालयातील सचिवालय कक्ष अधिकारी यांना पाठवले. त्यांवर प्रांतअधिकारी यांनी चर्चा केली. दर्गा ट्रष्टची, वक्फ आणि धर्मादायकडे नोंदणी झाली आहे. यावर मुख्यमंत्री यांची वेळ घेतली आहे. चर्चेतून मार्ग निघेल सध्या हे आंदोलन स्थगित करावे असे सांगितले.

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी शेख महमंद याचे मंदिर व्हावे हे तालुक्याची मागणी आहे. प्रश्न सोडवावे लागतात. पोलीस ,महसूलच्या मार्गाने जाव लागते. चांगले काम करणाऱ्यावर आरोप होत असतात. त्याकडे दुर्लक्ष करा. वाईट बोलणारे कमी असतात पण ते चुकीचे विचार मांडून दिशाभूल करतात. मंदिर होईल कुणी मागे राहणार नाही. शेख महंमद महाराज याचे साहित्य भरपूर आहे.

त्या आधारावर सगळे मंदिराच्या बाजूने आहेत. आता अडचणी संपणार परत उपोषण आंदोलन करावे लागणार नाही. लवकर मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रम व्हावा. शेख महंमद मदतीला येतील. चांगले काम करणाऱ्याला लोक बोलतात. आपण चालत राहू. सगळे एकत्र राहू. यावेळी जेष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी सर्व आंदोलनाला प्रशासन सामोरे जाते. पण या मोर्चाचे नेतृत्व बंडातात्या,माणिक महाराज,जब्बार महाराज लोकप्रतिनिधी करत होते.

पण याचे निवेदन स्वीकारण्याची प्रशासनाने उशीर केला. सर्व देवस्थान ,वारकरी यांनी पाठिंबा दिला. शिवसेना अध्यात्मिकचे अक्षय महाराज भोसले उपमुख्यमंत्री यांच्या लक्षात प्रकरण आणून दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत बैठक लावण्याचा आश्वासन दिले. आंदोलन बाबतीत गावाला काय सांगायचे ते सर्वांनी सांगा. राज्य सरकारने विषय मार्गी लावावा. एक महिन्यात राज्य सरकारने मार्ग काढावा. अन्यथा एक महिन्याच्या नंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहोत. जो पर्यंत मंदिराचा नारळ फुटतं नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असे त्यांनी सांगितले.

बाबासाहेब भोस यांनी बारा दिवस आंदोलन सुरू आहे. कायद्याच्या चौकटीत विषय शासन पातळीवर सुटणार होता. बुधवारी यावर मंत्रालयात चर्चा होईल.चर्चेन प्रश्न सुटत असेल तर निर्णय घेऊ.मंदिराच्या जीर्णोद्धार साठी आंदोलन आहे. यात फाटे फोडू नका. असे सांगितले.यात्रा कमेटी अध्यक्ष गोपाळ मोटे यांनी वक्फ आणि दर्गा ट्रष्ट रद्द होई पर्यंत शांत बसणार नाही. हिंदुच मंदिराचा उत्सव साजरा करतात पण गावकऱ्यांवर आणि यात्रा समितीवर आरोप केले गेले. पण आता मंदिरासाठी आश्वासन मिळले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News