Pakistan ची Air Defence उधवस्त ! भारताचा जबरदस्त हवाई हल्ला

Published on -

भारतीय हल्ल्यात अनेक HQ-9 क्षेपणास्त्र प्रक्षेपक, रडार आणि नियंत्रण केंद्रे पूर्णपणे नष्ट झाली, ज्यामुळे पाकिस्तानच्या हवाई संरक्षण व्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आली. एएनआयच्या अहवालानुसार, पाकिस्तानात तैनात असलेल्या चीनच्या HQ-9 क्षेपणास्त्र यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चीनमध्ये निर्मित ही लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत हल्ला करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा पाकिस्तानच्या बहुस्तरीय संरक्षण यंत्रणेचा महत्त्वाचा भाग मानली जाते.

एएनआयच्या माहितीनुसार, भारताच्या अचूक हल्ल्यांमुळे अनेक HQ-9 प्रक्षेपक आणि त्यांच्याशी संबंधित रडार यंत्रणांचे नुकसान झाले, ज्यामुळे पाकिस्तानच्या अग्रभागी हवाई संरक्षण क्षमतेला मोठा तडाखा बसला. पाकिस्तानने भारतीय सैन्य तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारताने त्यांची रडार यंत्रणा नष्ट करून हा हल्ला परतवून लावला.

HQ-9 ही चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशन (CPMIEC) ने विकसित केलेली जमिनीवरून हवेत हल्ला करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. ही यंत्रणा चीनच्या प्रगत लष्करी तंत्रज्ञानाचे प्रतीक मानली जाते आणि 2021 मध्ये ती पाकिस्तानच्या सैन्यात सामील करण्यात आली.

भारताच्या प्रगत हवाई युद्ध साधनांमुळे, विशेषतः राफेल लढाऊ विमाने, सुखोई एसयू-30 एमकेआय आणि ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानला चिंता होती. यामुळे त्यांनी HQ-9 सारख्या यंत्रणांवर अवलंबून राहण्याचा निर्णय घेतला, जी आता भारतीय हल्ल्यात नष्ट झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe