महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षण विभागाचा नवीन निर्णय

राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी तसेच शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Published on -

Maharashtra Schools : पुढील महिन्यात अर्थात जून महिन्यात राज्यातील सर्व शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 जून 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2025 – 26 हे 15 जून 2025 पासून सुरु होणार असून 16 जून पासून प्रत्यक्षात शाळा भरणार आहेत. दरम्यान नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच आणि शाळा ओपन होण्याआधीच राज्यातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

ही बातमी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक खास राहणार आहे. जर तुमच्या हे कुटुंबात पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणारे मुलं असतील तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहील. कारण की, महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून नवीन शैक्षणिक वर्षाच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला असून राज्यातील कोणताही विद्यार्थी पुस्तकांविना आणि शिक्षणापासून वंचित राहू नये हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.

शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक मिळणार!

यावर्षी राज्यातील सर्व शाळा 16 जूनला उघडतील अशी माहिती हाती आली आहे. परंतु विदर्भातील शाळा थोड्याशा उशिराने उघडणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीच्या काही दिवस विदर्भातील शाळा सकाळ सत्रातच भरवल्या जाणार आहेत.

कारण म्हणजे त्या ठिकाणी जून महिन्यात प्रचंड तापमान वाढ पाहायला मिळते आणि यामुळे विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागू शकते. दुसरीकडे विदर्भ विभाग वगळता राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये शाळा या 16 जून पासून सुरू होतील.

दरम्यान शाळेच्या पहिल्याच दिवशी राज्यातील विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यासाठी, ती शाळा सुरू होण्याच्या सात दिवस आधीच संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात दिली जाणार आहेत. म्हणजे शाळा सुरू होण्याच्या सात दिवस आधी मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहोच केली जाणार आहेत.

विभागीय, तालुका आणि केंद्रस्तरावर पाठ्यपुस्तकांच्या साठवणुकीची सोय सुद्धा केली जाईल अशी माहिती यावेळी संबंधितांकडून देण्यात आली आहे. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या या पाठ्यपुस्तकांच्या वाहतुकीची जबाबदारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई येथील कार्यालयाकडून तसेच जिल्हा आणि तालुका शिक्षण विभागांमार्फत पार पाडली जाईल असे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक उपलब्ध करून देण्याचा उद्देश 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये शाळेचा पहिला दिवस सुरू झाल्यावर, संबंधित पदाधिकारी, अधिकारी, पालक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.

यामुळे विद्यार्थी पहिल्या दिवसापासूनच नव्या अभ्यासक्रमाला सुरुवात करू शकतील. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती 100% सुनिश्चित करणे आणि गळतीचे प्रमाण कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe