मुंबईजवळ ‘या’ भागात तयार झाला चारपदरी दुमजली फ्लायओव्हर ! नव्या उड्डाणपूलामुळे प्रवाशांचा 30 मिनिटांचा वेळ वाचणार

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील वाहतूक कोंडी यामुळे मुंबईकर पुरते हतबल झाले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा मुंबईकरांना मोठा फटका बसतोय. अशातच मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे शहरात एका ठिकाणी भव्य दुमजली उड्डाणपूल विकसित झाला असून याचे लोकार्पण नुकतेच पूर्ण झाले आहे.

Published on -

Mumbai Flyover News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईला एका नव्या फ्लायओव्हर प्रोजेक्टची भेट मिळाली आहे.

यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट होणार आहे. मुंबईमधील वाहतूक कोंडीची समस्या फारच जटील बनत चालली आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे.

दरम्यान, हीच वाहतूक कोंडी सोडवण्याच्या अनुषंगाने शहरात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मुंबई ते ठाणे हा प्रवास वेगवान व्हावा यासाठी एक नवीन उड्डाणपूल शहरात विकसित करण्यात आला आहे.

खरे तर, मुंबई ते ठाणे हा प्रवास फारच आव्हानात्मक बनला होता, घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सर्वसामान्य ठाणेकरांना आणि मुंबईकरांना त्रास देत होती.

दरम्यान, घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी घोडबंदर रस्त्यावर एक नवीन फ्लायओव्हर विकसित करण्यात आलाय. घोडबंदर रस्त्यावरील भायंदरपाडा जंक्शनवर चार पदरी उड्डाणपूल विकसित करण्यात आला असून याचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले आहे.

प्रवाशांचा अर्ध्या तासाचा वेळ वाचणार !

भायंदरपाडा जंक्शनवर विकसित झालेल्या या नव्या चारपदरी उड्डाणपूलामुळे मुंबई ते ठाणे हा प्रवास सुसाट होणार आहे. या प्रवासादरम्यानचा कालावधी जवळपास अर्ध्या तासाने कमी होणार आहे. प्रवाशांचे 25 ते 30 मिनिटे वाचणार असल्याने या उड्डाणपुलाच्या लोकार्पणानंतर प्रवासी मोठ्या प्रमाणात समाधानी दिसलेत.

हा उड्डाणपूल प्रकल्प मुंबईच्या उपनगरांपासून नवी मुंबई, नाशिक आणि गुजरातला जोडणाऱ्या रहदारीला गती देणार असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. या प्रकल्पामुळे ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार अशी आशा आहे आणि यामुळे या परिसरातील वाहतूक सुरळीत होईल.

पहिला त्रिस्तरीय एकात्मिक वाहतूक प्रकल्प 

हा ठाणे शहरातील पहिला त्रिस्तरीय एकात्मिक वाहतूक प्रकल्प आहे. या प्रकल्पा अंतर्गत खालच्या स्तरावर महामार्ग आहे, मग त्यावर उड्डाणपूल आहे आणि त्यावर मग मेट्रो मार्गिका आहे.

अजून यातील मेट्रोमार्ग कार्यान्वित झालेला नाही पण येत्या काही महिन्यांत मेट्रो सेवा सुरू झाल्यावर प्रवाशांना आणखी दिलासा मिळणार आहे. या उड्डाणपुलामुळे ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, जवाहरलाल नेहरू पोर्ट, बोरिवली, वसई-विरार आणि गुजरात येथील वाहतूक अधिक जलद होणार असा आशावाद व्यक्त केला जातोय.

या नव्या प्रकल्पामुळे प्रवाशांना सिग्नल विरहित प्रवास करता येणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कडून विकसित करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe