Ahilyanagar News : पावसात ‘तो’ झाडाखाली थांबला, इतरांनाही गप्पा मारायला बोलावले अन वीज कोसळली, क्षणार्धात मृत्यू…

Updated on -

Ahilyanagar News : राहुरी तालुक्यातील रामपूर येथे शेतात ट्रॅक्टर रोटा मारत असताना ट्रॅक्टर मालक राहुल पठारे यांनी अचानक आलेल्या पावसामुळे झाडाचा आश्रय घेतला. त्याचवेळी नालकर बंधू मोटारसायकल वरुन जात असताना त्यांना राहुल पठारे यांनी बोलावून घेत पाऊस उघडे पर्यंत थांबा असे म्हणत थांबून घेतले.

गप्पा मारत असताना अचानक वीज पडल्याने राहुल पठारे याचा जागीच मृत्यू झाला. तर भारत नालकर व राहुल नालकर हे दोघे जखमी झाले आहे. जखमींवर प्रवरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पावसा पासून बचाव करण्यासाठी राहुल यांनी झाडाचा आश्रय घेतला. पावसात नालकर बंधू चालले असताना त्यांना राहुल पठारे यांनी झाडा खाली बोलावून घेतले.

भारत नालकर व राहुल नालकर आणि राहुल पठारे हे गप्पा मारीत असताना ढगात विजेचा मोठा आवाज झाला.तीच वीज राहुल पठारे (वय ४१) यांच्या अंगावर पडल्याने जागीच ठार झाले तर भारत नालकर व राहुल नालकर हे दोघे जण जखमी झाले आहे.

राहुल पठारे व अन्य दोन कामगारांना लोणी प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.राहुल पठारे यांची वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता मयत झाल्याचे सांगितले.

तर भारत नालकर व राहुल नालकर या दोघांचे पाय भाजले असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राहुरीचे तहसिलदार नामदेव पाटील यांनी घटनेची माहिती घेवून जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती कळविली आहे. घटनास्थळी कामगार तलाठी यांनी भेट दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe