7th Pay Commission : तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत आहात का किंवा तुमच्या परिवारातून कोणी राज्य शासकीय सेवेत आहे का ? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि देशात सर्वत्र आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे.
केंद्रातील सरकारने जानेवारी 2025 मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून तेव्हापासूनच नव्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

ही बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत. खरे तर, मीडिया रिपोर्ट मध्ये पुन्हा एकदा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सध्याचे सेवानिवृत्तीचे वय
सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे. तसेच देशातील जवळपास 25 हून अधिक राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष एवढे आहे.
याशिवाय महाराष्ट्र राज्यातील गट ड संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा 60 वर्षे एवढे निश्चित करण्यात आले आहे. मात्र राज्यातील गट-अ ब आणि क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे एवढे आहे.
म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि देशातील इतर राज्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी कमी आहे आणि याचमुळे इतर कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा 60 वर्षे एवढे झाले पाहिजे अशी आग्रही मागणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि सरकारी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून उपस्थित केली जात आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय किती वाढणार?
खरतर, गेल्या शिंदे सरकारने महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे केले जाईल आणि याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे अशी भूमिका बोलून दाखवली होती.
मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून साठ वर्ष करण्याला काही कर्मचारी संघटनांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून जोरदार विरोध दर्शवण्यात आला आणि याच विरोधामुळे गेल्या शिंदे सरकारने यासंदर्भातील निर्णय पुढे ढकलला.
दरम्यान आता काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये जर येत्या दोन वर्षात राज्यातील विविध विभागातील रिक्त पदे भरली गेली नाही तर राज्य सरकारकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाऊ शकते असा दावा होऊ लागला आहे. त्यामुळे खरंच राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षांपर्यंत केले जाईल का? ही गोष्ट पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.