JEE Main परीक्षा दिली नाही तरी ‘या’ 5 इंजीनियरिंग कॉलेजमधून बीटेकची पदवी घेता येणार ! इथे ऍडमिशन मिळाल म्हणजे लाईफ सेट होणार

12 वी सायन्स उत्तीर्ण होणारे बहुतांशी विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत आहेत. दरम्यान, जर तुम्हाला इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे.

Published on -

Top Engineering College : बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर लाखों विद्यार्थी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतात. आपल्या देशात इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. दरम्यान याही वर्षी लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंगला प्रवेश घेणार आहेत.

महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीचा रिझल्ट डिक्लेअर केला आहे आणि आता बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी लगबग करत आहेत. इंजीनियरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असल्यास विद्यार्थ्यांना जेईई मेन, राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा किंवा कॉलेजच्या वैयक्तिक प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.

पण अनेक विद्यार्थ्यांना जेईई मेन परीक्षित अपेक्षित यश मिळत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही. पण आज आपण अशा काही कॉलेजेसची माहिती जाणून घेणार आहोत जिथे जेईई मेन परीक्षा न देता प्रवेश मिळू शकतो.

या कॉलेजमध्ये JEE Main शिवाय प्रवेश मिळतो

BITS कॉलेज : BITS चे मेन कॅम्पस पिलानी, गोवा आणि हैदराबाद येथे आहेत. या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना JEE Main शिवाय प्रवेश मिळतो. या कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घ्यायचे असल्यास विद्यार्थ्यांना BITSAT ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

ही कॉलेजची वैयक्तिक प्रवेश परीक्षा आहे. BITS ला प्रायव्हेट सेक्टर मधील आयआयटी कॉलेज म्हणून ओळखले जाते. या कॉलेजमधील प्लेसमेंट रेकॉर्ड हा फारच उत्कृष्ट असून जर तुम्ही इथून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले तर तुम्हाला नक्कीच चांगल्या कंपनीत नोकरी मिळणार आहे.

VIT कॉलेज : VIT चे कॅम्पस वेल्लोर, चेन्नई, भोपाळ आणि अमरावती या ठिकाणी आहे. या इंजीनियरिंग कॉलेजमध्ये देखील विद्यार्थ्यांना जेईई मेन शिवाय प्रवेश मिळू शकतो. या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी VITEEE ही प्रवेश प्रक्रिया द्यावी लागते.

जर तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं तर नक्कीच तुमची लाईफ सेट होणार आहे. व्हीआयटी हे एक खासगी विद्यापीठ आहे, जे तांत्रिक शिक्षणात फारच उत्कृष्ट मानले जाते. या कॉलेजचे आधुनिक कॅम्पस, कॅम्पस लाइफ, लॅब आणि प्लेसमेंट सर्व काही उच्च दर्जाचे आहे.

Jadavpur University : कोलकत्ता येथील जाधवपूर युनिव्हर्सिटी इंजीनियरिंगसाठी बेस्ट कॉलेज आहे आणि महत्त्वाचे म्हणजे या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवे असेल तर तुम्हाला जेईई मेन ही परीक्षा सुद्धा द्यावी लागत नाही.

पण, या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असल्यास WBJEE ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. हे एक शासकीय विद्यापीठ आहे जे की, अत्यंत कमी किंमतीत दर्जेदार शिक्षण प्रदान करत आहे. या विद्यापीठाचा अभियांत्रिकी विभाग देशातील सर्वोत्कृष्ट आहे.

SRM University : एसआरएम विद्यापीठ उद्योग-अनुकूल अभ्यासक्रम, इनोव्हेशन हब आणि बहु-शिस्तीच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. हे विद्यापीठ प्लेसमेंट आणि इंटर्नशिपसाठी खूप चांगले आहे. याचे कॅम्पस चेन्नई, अमरावती, एनसीआर आणि सिक्कीम मध्ये आहे. SRMJEEE परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना या विद्यापीठात इंजीनियरिंगसाठी प्रवेश मिळतो.

Amity University : हे विद्यापीठ इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी विशेष लोकप्रिय आहे. हे विद्यापीठ केवळ तांत्रिक शिक्षणावरच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या एकूण विकासावरही लक्ष केंद्रित करते. Amity JEE किंवा बारावी बोर्ड परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळवता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!