2025 मध्ये तिसरे महायुद्ध ? होणार मानव जातीच्या नाशाला सुरुवात ? पहा बाबा वेंगाचे धक्कादायक भविष्यवाणी

वाचकहो म्हणता म्हणता 2025 सुरु होऊन 5 महिने संपले देखील, 2025 साली अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत, अचूक भविष्यवाण्यांमुळे चर्चेत असलेल्या बाबा वेंगांनी 2025 साठी केलेलं भाकीत अंगावर शहारा आणणारं आहे. तिसऱ्या महायुद्धाचा इशारा, नैतिकतेचं पतन आणि मानवतेच्या अस्तित्वावरचं टांगतं संकट असून हे ऐकून जगात चिंता वाढलीय.

Published on -

Baba Venga Prediction :- भविष्याबाबतची उत्सुकता ही माणसाच्या स्वभावातच आहे. काहीजण विज्ञानावर विश्वास ठेवतात, तर काहीजण भविष्यवाण्यांवर. यामध्ये एक नाव वारंवार चर्चेत येतं व ते म्हणजे बाबा वेंगा. दृष्टहीन असलेल्या या बल्गेरियन स्त्रीने अनेक वर्षांपूर्वी केलेली काही भाकितं अचूक ठरल्याचं म्हणतात, त्यामुळे तिच्या प्रत्येक नव्या भविष्यवाणीकडे जग जागरूकतेने पाहतं. आणि आता, २०२५ साठी केलेलं तिचं एक धक्कादायक भाकित पुन्हा एकदा जगाच्या चिंतेला गती देतंय.

२०२५ या वर्षासाठी बाबा वेंगांनी वर्तवलेले भाकीत

बाबा वेंगांनी असं म्हटलं आहे की २०२५ हे वर्ष जगासाठी संकटांनी भरलेलं ठरेल. विशेषतः तिसरं महायुद्ध याच काळात सुरू होण्याची शक्यता तिने व्यक्त केली आहे. हे युद्ध मुख्यतः युरोप खंडात प्रचंड विध्वंस करणारे ठरेल, असं तिचं म्हणणं आहे. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष, त्यात अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांची वाढती गुंतवणूक पाहता, वेंगांचं भाकित फारसं अवास्तव वाटत नाही. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञसुद्धा या तणावाकडे गांभीर्याने पाहू लागले आहेत आणि युद्ध टाळण्यासाठी जागतिक राजकारणातील समतोल राखण्याची गरज अधोरेखित करतात.

कर्करोगावर उपचार

मात्र या काळोख्या अंदाजामध्ये एक आशेचा किरणसुद्धा आहे. बाबा वेंगा सांगतात की २०२५ मध्ये विज्ञानाला एक मोठं यश मिळेल. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारावर उपचार सापडतील. ही बातमी ऐकून जगभरातील वैज्ञानिक, संशोधक आणि रुग्ण आशावादी होत आहेत. जिथे एकीकडे युद्धाचा धोका आहे, तिथे दुसरीकडे मानवजातीसाठी आरोग्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललं जाईल, हे कल्पनाच मनाला उभारी देणारं आहे.

आर्थिक अस्थिरता

अर्थकारणाच्याही पातळीवर बाबा वेंगांचं भाकित थोडं भयावह आहे. ती म्हणते की जगभरात आर्थिक अस्थिरता वाढेल. व्यापारात संघर्ष, राजकीय घुसखोरी आणि विश्वासाच्या तुटलेल्या नात्यांमुळे गरीब देश जास्त अडचणीत सापडतील. काही देश तर मंदीत लोटले जातील. अशा वेळी आंतरराष्ट्रीय सहकार्य, धोरणात्मक योजना आणि मानवी मूल्यांची जपणूक करणे ही काळाची गरज ठरेल.

सर्वात धक्कादायक भाकीत

पण बाबा वेंगाचं सर्वात धक्कादायक भाकित म्हणजे २०२५ ही मानवतेच्या अधोगतीची सुरुवात असू शकते. तिचं म्हणणं आहे की लोक हळूहळू आपल्या नैतिकतेपासून, सहवेदनेपासून दूर जातील. हे केवळ एक सामाजिक बदल न राहता, जगभरात मूल्यांच्या बदलाकडे नेणारा प्रवास ठरेल. तिच्या मते, शेवटी ५०७९ मध्ये संपूर्ण मानवजातीचं अस्तित्व संपुष्टात येईल. पण त्याआधी जग काही अभूतपूर्व गोष्टींचा साक्षीदार होईल.

शुक्र ग्रहावर ऊर्जा 

ती सांगते की मानव २०२८ मध्ये शुक्र ग्रहावरून ऊर्जा शोधण्यास सुरूवात करेल. २१३० पर्यंत एलियन प्रजातींशी संपर्क साधण्याचा दावा करते, आणि ३००५ मध्ये मानव मंगळावर आपलं पहिले पाऊल टाकेल. हे सर्व ऐकताना विज्ञानकथेसारखं वाटतं, पण तिच्या अनेक भविष्यवाण्या यापूर्वी सत्यात उतरल्याचं म्हणतात, त्यामुळे तिचं प्रत्येक भाकित आपल्याला विचार करायला भाग पाडतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe