शेतकऱ्यांनो! पीक फेरपालट करून जमीनीचा पोत सुधरवा अन् उत्पादनात भरघोस वाढ करा; कृषी खात्याचा सल्ला

अहिल्यानगर परिसरातील कृषी तज्ज्ञ व विभागाने शेतकऱ्यांना पीक फेरपालट करण्याचा सल्ला दिला आहे. एकाच पीक पद्धतीमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता होत असून, विविध पिके घेतल्यास उत्पादनात वाढ होऊन आर्थिक लाभ होणार आहे.

Published on -

Ahilyanagar News: श्रीरामपूर- आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून सध्या पीक लागवडीचा निर्णय घेतला जात आहे. अनेक शेतकरी दरवर्षी एकच पीक घेत असल्यामुळे उत्पादनात घट होऊन आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे यंदा शेतात पीक फेरपालट केल्यास शेतकऱ्यांनी फायदेशीर ठरणार असल्याचे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

जमिनीतील एनपीके नाहीसा

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊस, सोयाबीन आणि मका पिकाने गेल्या काही वर्षापासून लागवडीचा विक्रमी टप्पा गाठला आहे. दरवर्षी अनेक शेतकरी आपल्या शेतात एकच पीक घेत असल्याने जमिनीतील एनपीके नाहीसे होऊन उत्पादनावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे वेगवेगळी पिके घ्यायला हवीत. त्यातून शेतकऱ्यांना फायदा होवू शकतो. 

वेगवेगळी पिके घ्यावीत

गेल्या वर्षी मक्याची लागवड केलेल्या क्षेत्रात यंदा सोयाबीनची पेरणी करावी. तर मागील वर्षीच्या सोयाबीनच्या क्षेत्रात मका, कापूस अथवा इतर पिकाची लागवड करावी. त्यामुळे पीक फेरपालट केल्याचे असलेले फायदे होतील. शेतकऱ्यांनी दरवर्षी वेगवेगळी पिके घेतल्यास जमिनीतील अन्नद्रव्ये संतुलित राहून उत्पादनात वाढ होते. श्रीरामपूर तालुक्यात अनेक शेतकरी सध्या नगदी पीक म्हणून दरवर्षी कापूस आणि सोयाबीन पीक घेण्यावर भर देतात. 

त्यामुळे कापूस व सोयाबीन पिकांच्या उत्पादनात फारशी वाढ होत नाही. त्यामुळे एकवेळ कपाशी, दुसऱ्या वर्षी सोयाबीन किंवा इतर पीक घ्यावे, जेणेकरून जमिनीचा पोत सुधारेल आणि उत्पादनात मोठी वाढ होईल, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.

कृषी खात्याकडून आवाहन

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात दरवर्षी एकच पीक घेतल्यास मातीतील अन्नद्रव्ये नाहीशी होऊन उत्पादनात मोठी घट होते. जमिनीतील अन्नद्रव्ये कमी झाल्यास पीक घेतल्यास त्याच्या उत्पादनात वाढ होताना दिसत नाही. नत्र स्थिरीकरणासाठी सोयाबीन, भुईमूग, मूग, तूर आदी वेगवेगळी पिके घेण्यावर भर द्यावा, असे आवाहन कृषी खात्याकडून करण्यात आले आहे.

अन्नद्रव्यांची कमतरता

अन्नद्रव्यांची कमतरता झाल्यास मुळकूज आणि खोडकूज यांसारखे रोग होण्याची शक्यता वाढते. अन्नद्रव्ये कमी झाल्यास मूळकूज आणि खोडकूज मुळकूजने झाडाच्या मुळांची वाढ थांबते, पाने पिवळी पडतात, झाड कमकुवत होते, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News