दानधर्म ही आपल्या संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि पुण्यप्रद परंपरा आहे. कुणालाही मदतीचा हात पुढे करणं, आपल्याजवळचा काही भाग त्यांना देणं, ही भावना आपल्याला लहानपणापासून शिकवली जाते. पण, प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवर केली तरच तिचं फलित लाभदायक ठरतं, असं मानलं जातं. त्याच नियमांपैकी एक म्हणजे “दानाची योग्य वेळ”. विशेषतः संध्याकाळच्या वेळी काही गोष्टींचं दान करणं हे वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रांच्या मते अशुभ मानलं जातं. त्यामुळे केवळ मनापासून केलेलं दान असूनही, कधी कधी त्याचे परिणाम नकारात्मकही होऊ शकतात.
हिंदू धर्मशास्त्रात संध्याकाळ म्हणजे एक अत्यंत संवेदनशील काळ मानला जातो. सूर्यास्ताच्या वेळी वातावरणात उर्जा बदलते, आणि याच वेळी केलेल्या कृतींचा थेट परिणाम आपल्यावर आणि आपल्या घरातील सुख-समृद्धीवर होतो, असं म्हणतात. त्यामुळे संध्याकाळी कोणत्या गोष्टींचं दान करू नये, हे जाणून घेणं फार आवश्यक ठरतं.

सुई आणि धागा
संध्याकाळच्या वेळी सुई आणि धागा यांचं दान टाळावं, असं वास्तुशास्त्र सांगतं. या दोन्ही सूक्ष्म आणि नाजूक गोष्टी असल्यामुळे, यांचं दान केल्याने घरातील आर्थिक चक्र विस्कळीत होऊ शकतं. याचा परिणाम म्हणून अचानक खर्च वाढणे किंवा नोकरी-व्यवसायात अडथळे येणे अशी परिस्थिती उद्भवू शकते.
हळद
हळद ही गुरू ग्रहाशी संबंधित असल्याने, तिचं संध्याकाळी दान करणं हे गुरूच्या अशुभ प्रभावाला आमंत्रण देणं ठरतं. गुरू हा ग्रह आपल्या जीवनातील ज्ञान, संपत्ती आणि मान-सन्मान या गोष्टींशी निगडित आहे. त्यामुळे हळद संध्याकाळी दान केल्यास या बाबतीत अडथळे निर्माण होऊ शकतात.
मीठ
मीठ हे आपल्या अन्नात चव आणतं, तसंच जीवनातही स्थिरता आणि संतुलन ठेवलं जातं. संध्याकाळी मीठ दान केल्यास, त्या स्थिरतेवर परिणाम होतो, आणि घरातील सदस्यांच्या नात्यांमध्ये कटुता किंवा मनमिळावूपणा कमी होण्याची शक्यता असते. याशिवाय, व्यवसायात नुकसान होण्याचा धोका वाढतो.
धन
धनाचे म्हणजेच रोख पैशांचे दान संध्याकाळी करणे हे देवी लक्ष्मीच्या कृपेपासून दूर नेणारे मानले जाते. लक्ष्मी ही संध्याकाळी घरी येते, असे मानले जाते आणि अशा वेळी जर आपणच धन घराबाहेर देत असू, तर ती घरात थांबत नाही, असं शास्त्र सांगतं. त्यामुळे संध्याकाळच्या सुमारास कोणालाही पैसे देणे टाळावं.
दूध आणि दही
दूध आणि दही हे दोन्ही चंद्राशी संबंधित असल्याने, यांचं संध्याकाळी दान करणं मानसिक शांतता, भावनिक स्थैर्य आणि कौटुंबिक समृद्धीवर प्रतिकूल परिणाम करू शकतं. काही शास्त्रांमध्ये तर असंही म्हटलं आहे की अशा प्रकारच्या दानामुळे घरातील सौख्य हळूहळू कमी होऊ लागतं.
जरी दान हे एका उदात्त हेतूने केलं जातं, तरी ते शास्त्रबद्ध रीतीने आणि योग्य वेळी केल्यासच त्याचा सकारात्मक परिणाम दीर्घकाळ टिकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं दान करण्याआधी त्याची वेळ, प्रकृती आणि प्रसंग यांचा विचार करणं आवश्यक आहे.