Maharashtra Schools : येत्या 16 जून पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 ची सुरुवात 16 जून 2025 पासून होणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशीम, आणि गडचिरोली हे 11 जिल्हे वगळता राज्यातील 25 जिल्ह्यांमधील शाळा 16 जून पासून सुरू होतील.
तसेच विदर्भातील जिल्ह्यांमधील शाळा 23 जून पासून सुरू होणार आहे. मात्र विदर्भातील शाळा या सुरुवातीला सकाळ-सत्रामध्ये भरवल्या जातील आणि त्यानंतर या शाळा नियमित भरतील. म्हणजेच आता राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे.

अशी परिस्थिती असतानाच आता या नव्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांचे वेळापत्रक बदलणार असल्याचा मोठा दावा सोशल मीडिया मध्ये होतोय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म youtube वर या संदर्भातील काही व्हिडिओज देखील पोस्ट करण्यात आले आहेत.
यामुळे त्या शैक्षणिक वर्षात खरंच राज्यातील सर्वच शाळांचे वेळापत्रक चेंज होणार का? याबाबत आता मोठ्या प्रमाणात चर्चा रंगताना दिसत आहेत. म्हणूनच आज आपण सोशल मीडियामध्ये नेमक्या शाळेच्या वेळापत्रकांबाबत काय चर्चा सुरू आहेत? सोशल मीडियामध्ये सांगितलेले नवीन वेळापत्रक नेमके कसे आहे ? याचाच आढावा घेणार आहोत.
कसे असणार राज्यातील शाळांचे वेळापत्रक ?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युट्युबवर एका यूट्यूब चैनल मध्ये असे सांगितले गेले आहे की, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळा सकाळी नऊ वाजेला भरलेला आणि सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील.
राज्यातील शाळा आता सकाळी नऊ ते सायंकाळी चार पर्यंत राहतील. शैक्षणिक वर्ष 2025 26 पासून सकाळी नऊ वाजेपासून ते 9:25 पर्यंत परिपाठ राहील. 9:25 पासून ते 11:25 पर्यंत सुरुवातीचे तीन लेक्चर्स होतील.
11:25 ते 11:35 पर्यंत दहा मिनिटांची लहान सुट्टी राहील. 11: 35 ते 12:50 पर्यंत दोन तासिका होतील. 12:50 ते दीड वाजेपर्यंत मोठी सुट्टी राहील. दीड वाजेपासून ते तीन वाजून 55 मिनिटांपर्यंत उर्वरित तासिका घेतल्या जाणार आहेत आणि शेवटचा पाच मिनिटात वंदे मातरम होईल आणि शाळा सुटणार आहे.
सदरचे वेळापत्रक येत्या शैक्षणिक वर्षांपासून अमलात आणले जाईल असा सुद्धा दावा सदर यूट्यूब चैनलवर करण्यात आला आहे. मात्र, राज्यातील शाळांचे वेळापत्रक चेंज होणार या ज्या चर्चा सुरू आहेत त्याबाबत अजून सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
पण लवकरच सरकारकडून आणि राज्य शिक्षण विभागाकडून या संदर्भात अधिकृत माहिती दिली जाईल अशी शक्यता आहे. शिक्षण विभाग लवकरच सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या या बातम्यावर स्पष्टीकरण देईल अशी अपेक्षा आहे.