Ahilyanagar News : महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणजेच अहिल्यानगर. अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे आणि या जिल्ह्याला सहकाराचा जिल्हा म्हणूनही ओळख प्राप्त आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकारी कारखाने अस्तित्वात आहेत.
जिल्ह्यात शिर्डी, शनिशिंगणापूर अशी अनेक प्रमुख तीर्थक्षेत्र सुद्धा आहेत. यामुळे या जिल्ह्याला भौगोलिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त आहे. पण तुम्हाला राज्यातील सर्वाधिक मोठ्या जिल्ह्यातील टॉप पाच श्रीमंत तालुक्यांची माहिती आहे का? नाही ना मग आज आपण याच संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत.

श्रीमंत तालुक्याचे निकष काय
खरेतर, जिल्ह्यातील टॉप 5 श्रीमंत तालुके कोणते? सर्वाधिक श्रीमंत तालुका कोणता ? याबाबत कोणतीच ठोस आणि अधिकृत माहिती उपलब्ध नाही. कारण म्हणजे सरकारी किंवा खाजगी स्तरावर तालुकानिहाय संपत्ती किंवा आर्थिक संपन्नतेची यादी सामान्यतः प्रकाशित केली जात नाही.
तथापि, आपण तालुक्याची आर्थिक संपन्नता काही निकषांच्या आधारावर ठरवू शकतो. आपण औद्योगिक विकासाच्या आधारावर म्हणजेच तालुक्यातील कारखाने, साखर कारखाने, आणि इतर उद्योग या आधारावर तालुक्याची श्रीमंती मोजू शकतो.
तसेच कृषी उत्पादन म्हणजे उसासारखी नगदी पिके, फळबागा (द्राक्षे, डाळिंब), आणि शेतीचे उत्पन्न या आधारावर देखील तालुक्याची संपन्नता मोजली जाऊ शकते. शिवाय रस्ते, शिक्षण संस्था, आणि व्यापारी केंद्र केंद्र अशा पायाभूत सुविधाच्या आधारावर आणि
लोकसंख्या आणि शहरीकरण याच्या बेसिसवर तालुक्यांची आर्थिक संपन्नता आपण मोजू शकतो.
जिल्ह्यात किती तालुके आहेत?
अहिल्यानगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. नगर, नेवासा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर, संगमनेर, अकोले, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, आणि राहुरी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुके आहेत.
जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत टॉप 5 तालुके
राहाता : राहाता हा जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाचा तालुका आहे. कारण म्हणजे या तालुक्यात शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर आहे. श्रीक्षेत्र साईनगरी शिर्डी हे जगभरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे आणि इथे जगभरातील भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी गर्दी करतात. साई मंदिरामुळे येथील पर्यटन, हॉटेल, आणि स्थानिक व्यापारात मोठी आर्थिक उलाढाल होते. याशिवाय, तालुक्यात साखर कारखाने आणि कृषी आधारित उद्योगही आहेत. एकंदरीत साईबाबा मंदिरामुळे राहाता हा जिल्ह्यातील सर्वाधिक आर्थिकदृष्ट्या समृद्ध तालुका मानला जाऊ शकतो.
कोपरगाव : कोपरगाव तालुका सहकाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. इथ साखर कारखाने आणि सहकारी संस्थां आहेत. येथील कृषी उत्पादन, विशेषतः ऊस, आणि साखर कारखान्यांमुळे या तालुक्याला आर्थिक स्थिरता लाभली आहे. याशिवाय, इथे नामांकित शैक्षणिक संस्था सुद्धा आहेत आणि मोठमोठे उद्योग सुद्धा स्थिरावले आहेत. तालुक्यात रस्त्यांचे आणि रेल्वेचे चांगले नेटवर्क आहे. या तालुक्याला सहकारी साखर कारखान्यांचे केंद्र मानले जाते. हेच कारण आहे की हा तालुका देखील आर्थिक दृष्ट्या मजबूत समजला जातो.
श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुका सुद्धा जिल्ह्यातील सर्वाधिक संपन्न तालुक्यांमध्ये येतो कारण म्हणजे हा तालुका साखर कारखाने, द्राक्ष उत्पादन, आणि फळबागांसाठी ओळखला जातो. येथील शेती आणि निर्यातीशी संबंधित व्यवसाय यामुळे हा तालुका आर्थिकदृष्ट्या सक्षम मानला जातो. द्राक्ष आणि साखर उत्पादनात या तालुक्याने आघाडी घेतलेली आहे.
संगमनेर : संगमनेर तालुकाही जिल्ह्यातील आर्थिक दृष्ट्या संपन्न तालुक्यांच्या यादीत समाविष्ट केला जाऊ शकतो. हे जिल्ह्यातील एक मोठे व्यापारी केंद्र आहे. येथे शेती (ज्वारी, द्राक्ष, डाळिंब), शिक्षण संस्था, आणि बाजारपेठा यामुळे आर्थिक गतिविधी चांगली आहे. याशिवाय, संगमनेर शहर हे जिल्ह्यातील दुसरे मोठे शहर आहे. हे जिल्ह्यातील एक प्रमुख व्यापारी आणि शैक्षणिक केंद्र आहे म्हणूनच हा तालुका आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे.
राहुरी : राहुरी तालुका सुद्धा जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुक्यांच्या यादीत समाविष्ट केला जाऊ शकतो. हा तालुका उसाच्या शेतीसाठी आणि साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय, येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामुळे शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातही योगदान आहे, जे अप्रत्यक्षपणे आर्थिक विकासाला चालना देते. एकंदरीत कृषी विद्यापीठ आणि साखर कारखान्यांमुळे हा सुद्धा तालुका आर्थिक दृष्ट्या संपन्न बनलेला आहे.
टीप : खरेतर, अहिल्या नगर जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुक्यांची ही यादी शासकीय आकडेवारीनुसार ठरवण्यात आलेली नाही. तर, ही यादी उपलब्ध माहिती आणि तालुक्यांच्या आर्थिक गतिविधींच्या विश्लेषणावर आधारित आहे. ठोस आकडेवारी किंवा सरकारी अहवाल उपलब्ध नसल्याने, वर सांगितलेले तालुके हे आर्थिक दृष्ट्या संपन्न असू शकतात असा अंदाज आहे.
पुणे जिल्ह्यात ज्या प्रमाणे हवेली तालुका सर्वाधिक श्रीमंत मानला जातो, कारण त्यात पुणे शहराचा समावेश आहे. याचप्रमाणे, राहाता तालुक्यात शिर्डीचा समावेश होतो आणि यामुळे हा तालुका अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुका आहे अस आपण म्हणू शकतो.