शुक्र आणि बुध ग्रहांच्या युतीने तयार होणारा “लक्ष्मी नारायण राजयोग” हा ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो. असा योग जेव्हा निर्माण होतो, तेव्हा संबंधित राशींना केवळ आर्थिकच नाही तर मानसिक, सामाजिक आणि व्यावसायिक स्थैर्यही प्राप्त होते. सध्या वृश्चिक आणि तुळ राशींवर या योगाचा विशेष प्रभाव पडतो आहे आणि या दोन्ही राशींसाठी पुढील काळ अतिशय फलदायी ठरणार आहे.

वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांना या योगामुळे अनेक प्रकारची सुखद बातमी मिळू शकते. नशिबाची साथ लाभेल आणि अनेक अडथळ्यांवर मात करता येईल. लांबचा प्रवास, विशेषतः परदेश प्रवासाचे योग निर्माण होत आहेत. तसेच धार्मिक स्थळांच्या यात्रांना जाण्याची संधीही मिळेल.
मानसिक शांती आणि आत्मिक समाधान यामुळे जीवनात सकारात्मकता वाढेल. जुने वाद मिटतील आणि नव्याने सुरुवात करण्यास योग्य वेळ ठरेल. विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरेल.
तुळ राशी
तुळ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग प्रगतीचा नवा मार्ग उघडू शकतो. करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते, नोकरी शोधणाऱ्यांना नवे पर्याय उपलब्ध होतील. नोकरीतील व्यक्तींना पगारवाढ आणि पदोन्नतीचा लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी नवे सौदे आणि आर्थिक लाभ मिळू शकतात. वडिलांशी संबंध अधिक दृढ होतील, कौटुंबिक जीवनातही समाधान मिळेल. अनेक अडकलेली कामे पूर्ण होतील आणि आत्मविश्वास वाढेल.
लक्ष्मी नारायण राजयोग
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शुक्र आणि बुध एका राशीत एकत्र येतात तेव्हा ‘लक्ष्मी नारायण राजयोग’ तयार होतो. लक्ष्मी ही धन, ऐश्वर्य, समृद्धीचे प्रतीक असून बुध हा वाणी, बुद्धिमत्ता आणि व्यवहारिक कौशल्याचा कारक ग्रह आहे. दोघांचा मिलाफ झाल्यावर ज्याच्या कुंडलीत हा योग तयार होतो त्याच्या जीवनातील सर्व क्षेत्रात भरभराट होते.