नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील ‘या’ शाळेला कुलूप ! शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

सीबीएसई बोर्डाची शाळा 9 जून 2025 पासून सुरू झाली आणि त्यानंतर आज 16 जून 2025 पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान शाळेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील एक प्राथमिक शाळा बंद करण्यात आली आहे.

Published on -

Maharashtra Schools : आज नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात. शैक्षणिक वर्ष 2025 – 26 चा आज पहिला दिवस. महाराष्ट्रातील तब्बल 25 जिल्ह्यांमधील शाळा आजपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या अर्थातच 2025 – 26 या शैक्षणिक वर्षाचा आज पहिलाच दिवस होता आणि आज राज्यभरातील शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.

विदर्भ वगळता राज्यातील इतर 25 जिल्ह्यांमधील शाळा आज सुरू झाल्यात, तर दुसरीकडे विदर्भातील शाळा 23 जून पासून सुरू होणार आहेत. दरम्यान नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील एका शाळेला कुलूप लागला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोंढवा येथील एक शाळा आज कायमची बंद करण्यात आली आहे. यामुळे संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आले आहे आणि पालकांच्या माध्यमातून शाळा बंद झाल्याने नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पुण्यातील ही शाळा बंद

आजपासून शाळा सुरू झाली आणि शाळेत पहिल्यांदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तसेच नव्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण दिसले. विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांमध्येही अगदीच उत्साहाचे वातावरण आहे.

पण संपूर्ण राज्यभर अशी परिस्थिती असतानाच पुणे जिल्ह्यातील कोंढवा येथील एक शाळा कायमची बंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात एक प्राथमिक शाळा अचानक बंद करण्यात आली आहे.

संस्थाचालकाने शाळा बंद करण्याचा निर्णय हा अचानकपणे जाहीर केला आणि यामुळे विद्यार्थी आणि पालकांना पहिल्याच दिवशी शाळेच्या गेटवर ताटकळत उभा रहावं लागलं.

कोंढवा येथील मुनोत प्राथमिक विद्यालय आजपासून अचानक बंद करण्यात आलं आहे. संस्थाचालकानं ही शाळा बंद केली असून यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली.

संस्थाचालकांनी मुनोत प्राथमिक विद्यालय आजपासून कायमचे बंद करण्यात आले असल्याचे जाहीर केले असून या शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना दुसऱ्या शाळेत ऍडमिशन घेण्यास सांगितले आहे.

खरंतर या शाळेत 300 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि आता ही शाळा बंद करण्याचा निर्णय झाला असल्याने या संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आले आहे.

या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दुसऱ्या शाळेत ऍडमिशन घ्याव लागणार आहे आणि साहजिकच यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!