केतूच्या अशुभ प्रभावांपासून मुक्ती देणारं भारतातलं एकमेव चमत्कारी मंदिर, जाणून घ्या मंदिराची विशेषता!

Published on -

दक्षिण भारताच्या सागरी किनाऱ्याजवळ वसलेल्या एका छोट्याशा गावात, ज्याचे नाव आहे कीझापेरुम्पल्लम येथे एक अद्भुत मंदिर आहे. हे मंदिर केवळ श्रद्धेचे स्थान नसून एका अध्यात्मिक शक्तीचा अद्वितीय अनुभव देते. हे मंदिर म्हणजे नागनाथस्वामी मंदिर.

या मंदिराची खासियत म्हणजे इथे केवळ भगवान शिवाची नव्हे, तर केतू या छाया ग्रहाची विशेष पूजा केली जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रात केतूला एक रहस्यमय ग्रह मानलं जातं, आणि याचे प्रभाव कधी अमुलाग्र बदल घडवतात, तर कधी गंभीर अडचणीही निर्माण करतात.

नागनाथस्वामी मंदिर

केतू ग्रहाचा प्रभाव सौम्य असला तरी तो अंतर्मुखता, आध्यात्मिकता आणि मोक्षदायी प्रवृत्तींशी संबंधित असतो. परंतु जेव्हा तो कुंडलीत अशुभ स्थितीत असतो, तेव्हा मानसिक अस्वस्थता, अपघात, शारीरिक वेदना किंवा कामात अडथळे यांसारखे परिणाम जाणवू लागतात. म्हणूनच याच्या नकारात्मक परिणामांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेकजण दक्षिण भारतातल्या या मंदिरात श्रद्धेने येतात.

नागनाथस्वामी मंदिर हे केवळ केतूच नव्हे, तर भगवान शिवालाही समर्पित आहे. या मंदिरातील विशेष केतूची मूर्ती ही सापाच्या डोक्याने आणि असुराच्या शरीराने बनलेली आहे. हे दृश्य पाहताना श्रद्धाळूंना एक गूढशक्तीचा अनुभव येतो. लोक म्हणतात की येथे पूजा केल्याने केतूच्या वाईट परिणामांपासून सुटका मिळते आणि जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. भक्त इथे येऊन भगवान शिवाची आणि केतूची पूजा करून आत्मिक शांततेचा अनुभव घेतात.

हे मंदिर चोळ राजांच्या काळात बांधले गेले असून, त्याच्या स्थापत्यशैलीतून त्यांचा गौरवशाली इतिहास जाणवतो. विशेष म्हणजे इथे केतू देवता पश्चिमेकडे तोंड करून उभे आहेत, आणि मूर्तीला पाच नागतोंडांचे रूप आहे जी एक विलक्षण कल्पनाशक्ती आणि आध्यात्मिक अर्थ घेऊन समोर येते.

मंदिराशी जोडलेली रहस्यमय गोष्ट

या मंदिराशी जोडलेली आणखी एक रहस्यमय गोष्ट म्हणजे राहू देवाला अर्पण केलेले दूध. असं मानलं जातं की केतू दोष असलेला व्यक्ती जेव्हा येथे येतो आणि राहू देवाला दूध अर्पण करतो, तेव्हा ते दूध निळसर रंगाचं होतं. यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नसला, तरी भक्तांच्या अनुभवांमुळे या कथेला जीव मिळतो.

पौराणिक आख्यायिका सांगतात की केतूने ऋषींच्या शापापासून मुक्त होण्यासाठी याच ठिकाणी तप केला होता. त्याची प्रार्थना इतकी प्रभावी होती की भगवान शिवाने त्याला शिवरात्रीच्या दिवशी दर्शन दिलं. आजही, या दिवशी हजारो भाविक केवळ केतू ग्रहाचा शांत प्रभाव मिळवण्यासाठी या मंदिरात गर्दी करतात.

राहू ग्रहाचीही होते पूजा

केतूसोबतच राहूच्या पूजेलाही येथे महत्त्व दिलं जातं. कारण वैदिक गणनेनुसार हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या विपरीत असले तरी, त्यांच्या संयोगानेच आयुष्यातील मोठे वळण ठरतं. म्हणूनच, येथे केतूची पूजा करताना राहूला दूध अर्पण केलं जातं, ज्यातून दोन्ही ग्रहांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!