चंद्रग्रहणाच्या सुतकात अन्नात तुळशीची पानं का टाकतात ?, जाणून घ्या यामागील कारण!

Published on -

सप्टेंबर 2025 मध्ये एक अत्यंत दुर्मीळ आणि आकर्षक खगोलीय घटना घडणार आहे, ती म्हणजे पूर्ण चंद्रग्रहण, ज्याचा अनुभव संपूर्ण भारतभर घेता येणार आहे. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून या चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व आहे. विशेष म्हणजे या ग्रहणात ‘ब्लड मून’ म्हणजेच लालसर चंद्राचे गूढ दर्शनही होणार आहे.

भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री म्हणजेच 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9:58 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल आणि 1:26 वाजता संपेल. म्हणजेच चंद्र जवळपास 3 तास 28 मिनिटं पृथ्वीच्या सावलीत राहील. हे एक पूर्ण चंद्रग्रहण असेल. संपूर्ण भारतात हे दृश्य सहज दिसेल आणि आकाशात चंद्र लालसर रंगाचा, गूढ रूपात भासेल ज्याला ‘ब्लड मून’ असे म्हणतात.

सूतक काळ कधी लागणार?

धार्मिक परंपरेनुसार, ग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधीपासून सुतक काळ लागू होतो. त्यामुळे 7 सप्टेंबरच्या दुपारी 12:58 पासूनच सुतक सुरू होईल. यानंतर मंदिरांचे दरवाजे बंद होतील आणि देवपूजेपासून ते खाण्यापिण्यापर्यंत अनेक धार्मिक नियम पाळावे लागतील.

असे मानले जाते की या काळात शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवावं लागतं. ध्यान, मंत्रजप, आणि मौन यांना विशेष महत्त्व दिलं जातं. विशेषतः गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी घ्यावी, असंही शास्त्र सांगतं. तसंच या काळात अन्न शिजवणं, खाणं टाळलं जातं, आणि पूर्वी तयार केलेल्या अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकून ते सुरक्षित केलं जातं.

तुळशीची पाने जेवणात का टाकतात?

तुळशीला भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते आणि ती अनेक धार्मिक कार्यांमध्ये वापरली जाते. त्यामुळे, ग्रहण काळात तुळशीचा वापर करणे शुभ मानले जाते. यामागील शास्त्रीय कारण म्हणजे, तुळशीमध्ये दाहक-विरोधी (anti-inflammatory) आणि बॅक्टेरियाविरोधी (antibacterial) गुणधर्म असल्याने, ती अन्नाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. त्यामुळे अन्नपदार्थांत तुळशीची पाने टाकली जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!