7th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभर आठवा वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत. 1 जानेवारी 2016 पासून लागू झालेला सातवा वेतन आयोग लवकर समाप्त होणार आहे आणि यानंतर 1 जानेवारी 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होईल.
दरम्यान हा नवा वेतन आयोग लागू होण्याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ केली जाणार आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात सुधारित करण्यात आला होता.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% करण्यात आला होता. ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली असून जुलै महिन्यापासून पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे.
यावेळी देखील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन किंवा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 57% किंवा 58% इतका होऊ शकतो.
दरम्यान केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळण्याआधी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून वाढवला जाणार आहे.
किती वाढणार DA?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दोन टक्क्यांनी वाढवला जाईल. सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% इतका असून यामध्ये दोन टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.
म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% एवढा होणार असून ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर जानेवारी महिन्यापासून लागू राहील. महत्त्वाची बाब अशी की, याबाबतचा प्रस्ताव सुद्धा तयार करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवायचं झाले तर याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आलाय. म्हणजेच येत्या काही दिवसांनी या प्रस्तावावर सरकारकडून निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
जर समजा जून महिन्याचा अखेरपर्यंत या प्रस्तावावर सरकारकडून निर्णय झाला तर जून महिन्याच्या पगारा सोबत म्हणजे जून महिन्यात जो पगार मिळेल त्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.
ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे. नक्कीच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला तर त्यांच्यासाठी ही एक दिलासादायक बाब राहणार आहे. यामुळे त्यांच्या पगारात वाढ होणार आहे.