डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘या’ भाज्या आणि फळांचा करा दररोज आहारात समावेश;चश्मा लावायचीही गरज पडणार नाही!

Published on -

डोळे ही आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाची इंद्रियं आहेत. आपण रोजच्या जीवनात मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यासारख्या स्क्रीनवर तासनतास घालवतो आणि जेव्हा डोळ्यांत जळजळ, धूसर दिसणे किंवा थकवा जाणवतो तेव्हा सगळा दोष आपण या तंत्रज्ञानाला देतो. पण बहुतांश वेळा डोळ्यांतील अशक्तपणाचे मूळ कारण शरीरातील विशिष्ट जीवनसत्त्वांची कमतरता असते, हे आपल्या लक्षातही येत नाही. डोळ्यांचं आरोग्य कायम टिकवून ठेवायचं असेल, तर तुमच्या आहारात काही आवश्यक जीवनसत्त्वांचा समावेश अत्यावश्यक आहे.

व्हिटॅमिन ए

सर्वप्रथम आपण व्हिटॅमिन ए विषयी बोलू. या जीवनसत्त्वाला ‘दृष्टीसाठीचं जीवनसत्त्व’ असं म्हटलं जातं. याची कमतरता झाल्यास रात्री दिसण्यात अडथळे येतात, डोळ्यांसमोर धूसरपणा निर्माण होतो आणि हलक्या अंधारात पाहणं अवघड जातं. हे लक्षात आलं तर लगेच आपल्या आहाराकडे लक्ष द्या. गाजर, पालक, पपई, लाल सिमला मिरची, आंबट फळं यामध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं. यांचं दररोज सेवन डोळ्यांना पोषण देतं आणि दृष्टी तीव्र राहते.

व्हिटॅमिन बी12

दुसरं महत्त्वाचं जीवनसत्त्व म्हणजे व्हिटॅमिन बी12. याच्या अभावामुळे डोळ्यांतील नसा कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे दृष्टिक्षीणतेची तक्रार वाढते. शरीराला ऊर्जा मिळवून देण्याबरोबरच हे जीवनसत्त्व मेंदू आणि डोळ्यांमधील नसा सक्षम ठेवण्यात मदत करतं. यासाठी अंडी, दूध, ताक, दही, मासे, सीफूड यासारखे पदार्थ खाणं उपयुक्त ठरतं. विशेषतः ज्या लोकांना अलीकडे थकवा, डोळ्यांत जडपणा जाणवतोय असं वाटत असेल त्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

व्हिटॅमिन सी

तिसरं आणि तितकंच महत्त्वाचं जीवनसत्त्व म्हणजे व्हिटॅमिन सी. याच्या कमतरतेमुळे डोळ्यांत जळजळ, सूज किंवा अशक्तपणा येऊ शकतो. व्हिटॅमिन सी हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं आणि डोळ्यांना हानीकारक घटकांपासून वाचवतं. संत्री, आवळा, लिंबू, ब्रोकोली, बेरी यासारख्या गोष्टींचा रोजच्या आहारात समावेश केल्यास डोळ्यांचं संरक्षण होते.

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!