अंकशास्त्र म्हणजे केवळ आकड्यांचा अभ्यास नाही, तर त्या आकड्यांमध्ये लपलेलं व्यक्तिमत्त्वाचं रहस्य उलगडण्याचं एक शास्त्र आहे. या रहस्यांमध्ये काही अंक असे असतात, ज्यांच्यावर विश्वास ठेवताना आणि संबंध ठेवताना विशेष सावधगिरी बाळगणं आवश्यक असतं. कारण या आकड्यांच्या लोकांमध्ये अशी काही वैशिष्ट्यं असतात जी त्यांना गूढ, धूर्त वागणुकीचं प्रतीक बनवतात.
मूलांक 3

अंक 3 असलेले लोक अत्यंत बोलके, हुशार आणि लोकांना सहज पटवून देणारे असतात. त्यांच्या संवाद कौशल्यामुळे ते सहजपणे कोणाच्याही मनात घर करू शकतात. पण त्यांचं हे आकर्षक व्यक्तिमत्त्व अनेकदा त्यांची खरी ओळख झाकतं. ते समोरच्याशी ज्या प्रकारे वागतात, ते तितकंच दुसऱ्यांशी वेगळं असतं. त्यांची भाषा आकर्षक आणि प्रभावी असते, पण त्यामागे खोटेपणा किंवा अतिशयोक्ती असण्याची शक्यता असते. ते एकाच वेळी अनेक भूमिका निभावतात मित्र, सल्लागार, साथीदार. पण कोणत्या भूमिकेत ते खरे आहेत हे समजणं कठीण होतं. अशा लोकांशी संबंध ठेवताना सावधगिरी आवश्यक आहे, विशेषतः जेव्हा गोष्ट विश्वासाची येते.
मूलांक 4
मूलांक 4 असलेले लोक खूपच रहस्यमय स्वभावाचे असतात. त्यांचा स्वामी ग्रह राहू असून, त्याचा प्रभाव त्यांच्या विचारसरणीवर स्पष्टपणे दिसून येतो. हे लोक गप्प राहतात, पण त्यांचा मेंदू सतत चालू असतो. ते तर्कशुद्ध आणि आत्मकेंद्रित असतात. भावनिकतेपेक्षा त्यांना बुद्धी आणि परिणाम यांचीच अधिक काळजी असते. अशा लोकांना त्यांच्या मर्जीप्रमाणे जगायचं असतं आणि कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप ते सहन करत नाहीत. त्यांच्या स्वभावातील हट्टीपणा आणि आत्मविश्वास हे एकीकडे त्यांना यशाकडे घेऊन जातं, पण दुसरीकडे त्यांच्या नात्यांमध्ये अडथळा निर्माण करू शकतो.
मूलांक 8
आता येतो अंक 8. हा अंक सत्तेचा, शिस्तीचा आणि कठोर कर्तव्यात रमणारा मानला जातो. 8 मूलांकाचे लोक गंभीर, शांत आणि गूढ असतात. ते फार कमी बोलतात, पण त्यांच्या विचारांमध्ये खोल अर्थ असतो. ते स्वतःसाठी एक वेगळे जग तयार करतात, जेथे फक्त काही मोजके लोकच प्रवेश करू शकतात. पैशाच्या बाबतीत हे लोक अत्यंत सजग आणि अभ्यासू असतात. अनेकदा असे पाहायला मिळते की जीवनाच्या एका टप्प्यावर ते अचानक मोठ्या आर्थिक यशाला गवसणी घालतात. पण त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि कोणत्याही प्रकारच्या खोट्या स्तुतीला नाकारण्याच्या वृत्तीमुळे, ते अनेकांना आवडत नाहीत. आणि म्हणूनच, काही लोक त्यांच्या थेटपणामुळे त्यांच्यापासून अंतर ठेवतात.
या अंकांतील लोक कधी मैत्रीचे मुखवटे घालतात, तर कधी आत्मकेंद्रित भूमिका निभावतात. म्हणूनच, या अंकांच्या लोकांशी व्यवहार करताना फक्त त्यांच्या बोलण्यावर नव्हे, तर त्यांच्या कृतीवर विश्वास ठेवणं केव्हाही चांगलं.
अशा वेळी अंकशास्त्र आपल्याला सावधगिरीचा इशारा देतं. जिथे विश्वास हवा तिथे संयम ठेवा आणि जिथे गूढता दिसते तिथे स्पष्टतेचा आग्रह ठेवा. कारण नातेसंबंध विश्वासावर उभे असतात, आणि त्यात जर दुहेरी भूमिका असतील, तर नातं फसण्याची शक्यता जास्त असते.