पैशाच्या समस्यांनी ग्रासलेल्या आयुष्यात जर काही साधे उपाय तुमचं नशीब उजळवू शकत असतील, तर ते नक्की करून पाहावेत, असं आपल्याला वाटतं. खास करून जेव्हा हे उपाय आपल्या जन्मतारखेशी म्हणजेच मूलांकाशी संबंधित असतात, तेव्हा त्यांचं महत्त्व आणखी वाढतं. अंकशास्त्र हे एक प्राचीन विज्ञान आहे जे तुमच्या जन्मतारखेवरून तुमच्या व्यक्तिमत्त्वासोबतच आर्थिक स्थितीवरही प्रभाव टाकणाऱ्या ग्रहांची माहिती देतं. त्यानुसार काही विशेष वस्तू तुम्ही पर्समध्ये ठेवल्या तर संपत्तीचं भाग्य तुमच्यावर प्रसन्न होऊ शकतं.
मूलांक 1

प्रत्येक मूलांकाचा एक विशिष्ट ग्रह अधिपती असतो आणि त्या ग्रहाशी संबंधित वस्तू पर्समध्ये ठेवली, तर आर्थिक अडचणी दूर होतात, असं मानलं जातं. उदाहरणार्थ, ज्यांचा मूलांक 1 आहे म्हणजे ज्यांचा जन्म 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला आहे त्यांनी पर्समध्ये तांब्याचं नाणं ठेवावं. यामुळे त्यांचा आदर वाढतो आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होते.
मूलांक 2
मूलांक 2 असलेल्या व्यक्तींनी (जन्मतारीख 2, 11, 20, 29) आपल्या पर्समध्ये चांदीचा लहान तुकडा किंवा चंद्रासंबंधित काही वस्तू ठेवावी, असं शास्त्र सांगतं. हे मनःशांती, भावनिक स्थैर्य आणि आर्थिक समृद्धी देतं.
मूलांक 3
मूलांक 3 असलेल्यांनी केशर पिवळ्या कागदात गुंडाळून आपल्या पर्समध्ये ठेवल्यास, गुरू ग्रह प्रसन्न होतो. हा उपाय केल्याने बुद्धिमत्ता, श्रीमंती आणि यश प्राप्त होतं.
मूलांक 4 आणि 5
मूलांक 4 आणि 5 दोघांच्याही पाठीमागे एकत्रित परिणाम दिसतो. या व्यक्तींनी आपल्या पर्समध्ये जवाचे दाणे ठेवावेत.जव हिरव्या कपड्यात गुंडाळून ठेवण्याने राहू किंवा बुध ग्रहाशी संबंधित अडथळे कमी होतात.
मूलांक 6
मूलांक 6 असलेल्या व्यक्तींनी वाळलेलं गुलाब फुल पर्समध्ये ठेवावं, यामुळे सौंदर्य, प्रेम आणि सौख्य वाढतं आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होते.
मूलांक 7
मूलांक 7 असलेल्यांनी आपल्या पर्समध्ये आपल्या प्रिय व्यक्तीचा फोटो ठेवावा. हे त्यांचं मानसिक स्थैर्य वाढवून त्यांना आर्थिक निर्णयांमध्ये यश मिळवून देतं.
मूलांक 8
मूलांक 8, जो शनीचा अंक मानला जातो, अशा व्यक्तींनी काळ्या कापडात गुंडाळलेलं नाणं पर्समध्ये ठेवावं. यामुळे शनीचा प्रकोप कमी होतो आणि व्यवसाय-नोकरीतील अडचणी दूर होतात.
मूलांक 9
तर मूलांक 9 असलेल्यांनी (जन्मतारीख 9, 18, 27) आपल्या पर्समध्ये लाल कलाव ठेवावा. त्यात 9 गाठी मारून ठेवावी, असं सांगितलं जातं. यामुळे मंगळ ग्रह बळकटी होतो आणि यशाच्या वाटा खुल्या होतात.