तुमच्या जवळच्याच व्यक्तीने तुमच्यावर खोटे आरोप लावले तर?, प्रेमानंद महाराजांनी दिलं मनाला शांती देणारं उत्तर!

Published on -

कधी कधी जीवनात असा क्षण येतो की आपण काहीही चुकलेलो नसताना, लोक आपल्यावर खोटे आरोप करतात. अशावेळी मनाला खोलवर लागते, पण तेव्हा काय करायचं? कसं वागायचं? याचं अत्यंत संयमी आणि शांत उत्तर प्रेमानंद महाराजांनी दिलं आहे, जे आज अनेकांच्या मनाला स्पर्श करतंय.

 

राधारानींचे भक्त असलेल्या प्रेमानंद महाराजांकडे देशभरातून लोक मार्गदर्शनासाठी, समाधानासाठी, आणि कधी कधी अशाच प्रश्नांसाठी जातात. जसं की “जर कोणी आपल्यावर खोटे आरोप केले तर आपण काय करावं?” या प्रश्नावर त्यांनी फारच साधं पण खोलवर जाणारं उत्तर दिलं आहे, ते म्हणजे देवाच्या नावाचा जप करा आणि मन शांत ठेवा.

काय म्हणाले प्रेमानंद महाराज?

महाराज म्हणतात, की आधी आपण स्वतःलाच विचारलं पाहिजे यात काही तथ्य आहे का? जर खोट्या आरोपामागे खरंच काही सत्य दडलं असेल, तर आपण आत्मपरीक्षण करावं. देव आपल्याला कदाचित एका चुकीच्या मार्गावरून थांबवण्यासाठी हे सगळं घडवत असेल. पण जर आपण निर्दोष असू, आणि हे सगळं केवळ दुसऱ्याच्या मतदोषामुळे होत असेल, तर आपण शांत राहिलं पाहिजे.

ते म्हणतात “लोक काय बोलतात, हे त्यांच्या बुद्धीवर आहे, आणि ती बुद्धी आपण बदलू शकत नाही. आपली बुद्धी, आपलं मन शांत ठेवलं पाहिजे.” हे बोलताना त्यांच्या शब्दांत एक शांत संयम जाणवतो, जणू जगाच्या गोंधळापासून दूर असलेली एक तपस्वी ऊर्जा.

“जग पाडण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही..”

महाराज पुढे स्पष्ट करतात “हे जग तुम्हाला उचलण्याऐवजी, पाडण्याचा प्रयत्न करणार. जे तुम्ही चांगलं करत असाल, त्याच्यावरही लोक संशय घेतील. पण त्यांचं ऐकून स्वतःचं मन विषण्ण करून घ्यायचं नाही.” त्यांनी अत्यंत मार्मिक उदाहरण दिलं “तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम केलं, तरी कधी कधी त्याच्याकडून हृदय दुखावलं जातं. म्हणूनच, जे चांगलं करा, ते नदीत फेकून द्या. अपेक्षा ठेवू नका.”

ते सांगतात की, हा संसाराचा खेळ आहे, इथे फसवणूक, नाटक, मत्सर, ईर्ष्या काहीच कमी नाही. पण या सगळ्यातूनही आपण आपला विश्वास, श्रद्धा आणि समाधान जपलं पाहिजे. कारण अखेर आपलं मनच आपल्या सुख-दुःखाचं मूळ आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!