राहुरी तालुका हे माझे आजोळ, त्यामुळे इथून पुढे राहुरीकडे लक्ष देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही

अधिवेशन संपताच आपण राज्याच्या काही भागाचा दौरा करणार असून राहुरी तालुक्यासाठी वेळ देईन. जे आज येऊ शकले नाही, त्यांनी त्यावेळी उपस्थित राहावे. राहुरी हे माझे आजोळ असल्याने राहुरीकडे यापुढे लक्ष देणार असल्याची अजित पवारांची ग्वाही.

Published on -

Ahilyanagar News: राहुरी- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्यांनी आपापल्या भागात जबाबदारीने काम करावे. पक्षाचे सदस्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. अधिवेशन संपताच आपण राज्याच्या काही भागाचा दौरा करणार असून राहुरी तालुक्यासाठी वेळ देईन. जे आज येऊ शकले नाही, त्यांनी त्यावेळी उपस्थित राहावे. राहुरी हे माझे आजोळ असल्याने राहुरीकडे यापुढे लक्ष देईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.

अरुण तनपुरे यांचा पक्षप्रवेश

मागील आठवड्यात डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे, युवा संचालक हर्ष तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार पक्षात प्रवेश केला होता. काल मुंबई येथील महिला विकास भवन येथे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री पवार यांचे हस्ते प्रवेश केला. यावेळी पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार धर्मराज आत्राम, डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे, संचालक हर्ष तनपुरे, तालुकाध्यक्ष दिलीप जठार, शहराध्यक्ष सुनील भट्टड आदि उपस्थित होते.

मतदारसंघातील विकासकामांना मदत

यावेळी चेअरमन तनपुरे म्हणाले की, आज तालुक्याचे दृष्टीने आनंदाचा क्षण असून ना. अजितदादा व पक्षश्रेष्ठींनी आम्हाला पक्षात प्रवेश दिला. दादांचे राहुरी हे आजोळ असून त्यांचे यापूर्वी तालुक्याच्या विकास कामाना जशी मदत केली तशी यापुढेही करतील असा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केला. 

अनेकांचा पक्षप्रवेश

काल. डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक विजय डौले, प. स.चे माजी सभापती वेणुनाथ कोतकर, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी उपाध्यक्ष दत्तात्रय पानसंबळ, अशोक विटनोर, मुळा प्रवरा वीज संस्थेचे माजी संचालक अय्युब पठाण, राहुरीचे माजी उपगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, अरुणोदय पतसंस्थेचे चेअरमन व माजी उपगराध्यक्ष बाळासाहेब उंडे, देवळाली प्रवराचे नगरसेवक आदिनाथ कराळे, माजी नगरसेवक दीपक साळवे, डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक नवनाथ ढोकणे, बाजार समितीचे माजी उपसभापती गोरक्षनाथ पवार, बाजार समितीचे संचालक दत्तात्रय शेळके, रखमाजी जाधव, रामदास बाचकर, उपसभापती दत्तात्रय कवाणे, डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक अशोक उहे, संचालक भास्कर ढोकणे, संचालक अरुण दूस, टाकळीमिया माजी सरपंच सुरेश करपे, संचालक जनार्दन गाडे, बाजार समितीचे संचालक सुभाष डुकरे, संचालक मधुकर पवार, संचालक, महेश पानसरे, आदर्श पतसंस्थेचे व्हा. चेअरमन आबासाहेब वाळुंज, तबाजीअण्णा तनपुरे, पतसंस्थेचे चेअरमन विलास तनपुरे, तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, माजी संचालक आप्पासाहेब जाधव, जोगेश्वरी सेवा संस्थेचे व्हा. चेअरमन प्रदीप भुजाडी, राहुरीचे माजी उपगराध्यक्ष दशरथ पोपळघट, नगरसेवक नंदकुमार कारखान्याचे माजी संचालक किशोर वने, सुखदेव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे उपस्थितीत प्रवेश केला. 

काल सकाळी चेअरमन अरुण तनपुरे यांचे मार्गदर्शनाखाली २०० जीप गाड्याचा ताफा मुंबई कडे निघाला. यावेळी किसनराव जवरे, अरुण ठोकळे, सुरेश बाफना, उपसभापती बाळासाहेब खुळे, माजी उपसभापती रवींद्र आढाव, किशोर जाधव, अनिल कासार, सूर्यकांत भुजाडी, सुनील मोरे, दिपक तनपुरे, दिनकर पवार, राऊ काका तनपुरे, बाबासाहेब येवले, संजय साळवे, विजय करपे, द्वारकानाथ बडढे यांचे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संग्राम जगतापांची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही

राष्ट्रवादी काँग्रेस सर्व जाती-धर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. विधिमंडळातील आमच्या एका सहकार्याने चुकीची भूमिका मांडली. ते पक्षाचे धोरण नाही. त्यांच्याशी मी आज बोललो आहे. त्यांनी घेतलेली भूमिका आपल्या पक्षाची नाही, हे त्यांना समजून सांगितले आहे. असेही आमदार संग्राम जगताप यांचा नामोल्लेख टाळून उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!