जास्त मीठ खाल्ल्याने होतात ‘हे’ 7 गंभीर परिणाम, दुर्लक्ष केलं तर वाढतो थेट मृत्यूचा धोका!

Published on -

आपल्या रोजच्या जेवणात चव आणण्यासाठी आपण मीठ वापरतो, पण चवीनंतर जर हेच मीठ आरोग्यावर परिणाम करू लागलं, तर? आजकाल अनेक जण नकळत इतकं मीठ खातात की शरीर त्याच्या त्रासाचे इशारे द्यायला लागतं. पण बहुतेक वेळा हे इशारे ओळखलेच जात नाहीत, आणि मग उशीर होतो. त्यामुळेच, या लक्षणांकडे लक्ष देणं आज काळाची गरज आहे.

एखाद्या दिवशी तुम्ही भरपूर पाणी प्यायलंत, तरी तहान भागत नाहीये असं वाटतंय? हे तुमचं शरीर सांगतंय की आत मीठ जास्त झालंय. शरीरातील सोडियमची पातळी वाढली की मेंदूला “अजून पाणी हवं” असा सिग्नल मिळतो, आणि तुम्ही तहानलेले वाटता, जरी शरीर पुरेसं हायड्रेटेड असलं तरीही. ही तहान काही वेळा इतकी त्रासदायक वाटू शकते की सतत पाणी पिऊनही समाधान वाटत नाही.

हाता-पायांवर सुजन येणे

पुढे लक्षात येतं की चेहऱ्यावर, हातांवर किंवा पायांवर सूज यायला लागली आहे. ही सूज केवळ थकव्यामुळे नसते, तर शरीरात पाणी साचत असल्याचं एक स्पष्ट लक्षण असू शकतं. जेव्हा शरीरात मीठाचं प्रमाण वाढतं, तेव्हा पाणी टिकवून ठेवण्याची प्रवृत्ती वाढते आणि सूज निर्माण होते. सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुजलेपण, बुटं अचानक घट्ट वाटणं, हे संकेत दुर्लक्षित करणे धोकादायक ठरू शकते.

डोकेदुखी, थकवा

याचबरोबर काहींना सतत डोकेदुखी, जडपणा, थकवा जाणवायला लागतो. हे सुद्धा मीठामुळे होऊ शकतं हे फार कमी लोकांना माहीत असतं. कारण सोडियम जास्त झालं की रक्तदाबही हळूहळू वाढतो, आणि त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. डोकेदुखीचं मूळ कारण शोधताना हे लक्षात येत नाही की आपली थाळीच आपल्याला त्रास देतेय.

उच्च रक्तदाब

त्यातच जर रक्तदाब वाढलेला असेल तर पहिलं लक्ष द्यायचं आहारातल्या मिठाकडे. कितीही व्यायाम केला, औषधं घेतली तरी जर मीठाचं प्रमाण जास्त असेल, तर हे सगळं निष्फळ ठरू शकतं. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की मीठ म्हणजे केवळ जेवणात घातलेलं नव्हे, तर चिप्स, पॅकेट फूड, लोणचं, पापड अशा गोष्टींमधूनही त्याचं प्रमाण खूप वाढतं.

जास्त मीठ शरीरातून बाहेर टाकण्यासाठी शरीराची यंत्रणा तासन्‌तास काम करत राहते. त्यामुळे लघवी वारंवार लागते आणि त्यात जळजळ होण्याची शक्यता देखील वाढते. काही वेळा शरीर इतकं थकून जातं की लघवीच्या वेळी त्रास किंवा संसर्गही होतो. हा त्रास केवळ तात्पुरता नसतो, तर किडनीवरही दीर्घकालीन परिणाम करू शकतो.

अचानक वजन वाढणे

कधी तुम्हाला जाणवतं का, की अचानक वजन वाढलंय किंवा कमी झालंय? पण डाएट, एक्सरसाइज काहीही बदललेलं नसतं. यामागेही मीठाचं गुपित लपलेलं असतं. शरीरात पाणी साचल्यामुळे वजन वाढतं.

झोपेवरही होतो परिणाम

शरीरात अधिक मीठ झालं तर, तुम्ही चवीनं काहीही खाऊ शकत नाही, आणि चव बिघडल्यासारखी वाटते. शेवटी, झोपेचा त्रास सुरू होतो. रात्री झोप लागत नाही, शरीरात अस्वस्थपणा जाणवतो, घाम येतो, आणि मन बेचैन राहतं. संशोधन सांगतं की यामागेही जास्त सोडियम हेच कारण आहे. शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडतं आणि त्यामुळे झोपेवर परिणाम होतो.

ही सगळी लक्षणं काहीशी साधी वाटू शकतात, पण ती पुढच्या गंभीर त्रासांची सुरुवात असू शकतात. म्हणूनच, जर हे संकेत तुम्हाला सध्या जरी सौम्य वाटत असले, तरी वेळीच स्वतःकडे लक्ष द्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!