महागाईचा भडका उडाला असताना घरीच पिकवा मिरचीचे पीक, अवघ्या 15 दिवसांत मिळतील भरपूर हिरव्या मिरच्या!

Published on -

जेव्हा जेवणात फोडणी दिली जाते, तेव्हा त्यात हिरव्या मिरच्यांचा तडका दिला नाही तर अन्नच पूर्ण वाटत नाही. परंतु दिवसेंदिवस भाजीपाला महाग होत चालला आहे आणि त्यातही ताज्या मिरच्यांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. अशा वेळी जर घरच्या अंगणात, गॅलरीत किंवा टेरेसवर तुम्हीच मिरच्या पिकवल्या, तर तुमचा खर्चही वाचेल आणि रोज ताज्या मिरच्या मिळतील.

तांदळाचं पाणी आणि लाकडाची राख

या स्वस्त आणि सोप्या पद्धतीसाठी फक्त दोन गोष्टींची गरज आहे.लाकडाची राख आणि तांदळाचं पाणी. प्रसिद्ध बागकाम तज्ञाच्या मते, लाकडाची राख अल्कधर्मी असते आणि ती जमिनीचा पीएच लेव्हल संतुलित ठेवण्यास मदत करते. मिरचीच्या झाडाला जेव्हा फुले येऊ लागतात, तेव्हा 1.5 लिटर पाण्यात एक मूठ लाकडाची राख मिसळून ती रात्रभर ठेवावी. दुसऱ्या दिवशी ती मातीवर ओतावी किंवा गाळून पानांवर फवारावी. हे पाणी आठवड्यातून एकदा वापरल्यास रोपाला पानं मुबलक प्रमाणात फुटतात.

त्याचबरोबर, तांदळाचं पाणीही मिरचीच्या झाडासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जेव्हा तुम्ही तांदूळ धुता, तेव्हा त्याचं पाणी एका भांड्यात गोळा करा आणि दर 3 ते 4 दिवसांनी ते मिरचीच्या मुळांमध्ये ओता किंवा पानांवर स्प्रे करा. यामुळे झाडाची वाढ जलद होते आणि पाने हिरवीगार राहतात.

विशेष काळजी घ्या

मात्र, काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. मिरचीच्या झाडाला दररोज किमान 6 ते 8 तास थेट सूर्यप्रकाश लागतो. शिवाय, झाडाची मुळे ओलसर ठेवावीत, पण पाणी साचू नये, अन्यथा मुळे कुजण्याची शक्यता असते.

फक्त लाकडाची राख आणि तांदळाचं पाणी वापरून तुम्ही घरच्या घरी 15 दिवसांत हिरव्या मिरच्यांची झाडं जोमात वाढवू शकता. यामुळे तुम्हाला बाजारात जाण्याची गरज भासणार नाही आणि तुमच्या स्वयंपाकघरात नेहमी ताज्या मिरच्या उपलब्ध राहतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!