वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी अपडेट ! PM मोदी 3 Vande Bharat ला दाखवणार हिरवा झेंडा, कसे असणार रूट?

Published on -

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 नोव्हेंबर 2025 रोजी देशाला आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट देणार आहेत. खरंतर सात नोव्हेंबरला पीएम मोदी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर येणार आहेत. ते त्यांच्या संसदीय मतदारसंघातूनचं रेल्वे प्रवाशांसाठी तीन वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन सुद्धा करणार आहेत.

बरेका येथील अतिथीगृहात रात्रीच्या विश्रांतीनंतर ते 8 नोव्हेंबर रोजी सकाळी दरभंगा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी रवाना होतील. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) शनिवारी जिल्हा प्रशासनाला त्यांच्या आगमनाची आणि नियोजित कार्यक्रमांची माहिती पाठवली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बिहारमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर, पंतप्रधान सायंकाळी 5 वाजता बाबतपूर विमानतळावर पोहोचतील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी आणि इतर वरिष्ठ लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे अधिकारी त्यांचे स्वागत करतील.

त्यानंतर ते लष्कराच्या हेलिकॉप्टरने बरेका येथील हेलिपॅडवर पोहोचतील. थोड्या विश्रांतीनंतर, ते संध्याकाळी 7:30 वाजता वाराणसी स्टेशनवर पोहोचतील आणि वाराणसी ते खजुराहो दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.

ते फिरोजपूर ते दिल्ली आणि लखनऊ आणि सहारनपूर दरम्यान धावणाऱ्या आणखी दोन गाड्यांचे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन करतील. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

जिल्हा दंडाधिकारी सत्येंद्र कुमार यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रस्तावित दोन दिवसांच्या दौऱ्यात वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. रात्रीच्या मुक्कामानंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी बिहारला रवाना होतील.

नक्कीच या आगामी वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास हा वेगवान होणार असून यामुळे वंदे भारत एक्सप्रेसचे नेटवर्क आणखी मजबूत होण्यास मदत मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे नजीकच्या भविष्यात आपल्या महाराष्ट्राला देखील नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट मध्ये पुणे ते नांदेड दरम्यान येत्या काळात वंदे भारत ट्रेन धावणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नक्कीच या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावली तर प्रवाशांचा प्रवास यामुळे वेगवान होणार आहे.

या गाडीमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे. विशेष बाब अशी की ही गाडी या वर्षाच्या अखेरीस प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News