Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडिया ने अलीकडेच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआय ने महाराष्ट्रातील एका बड्या सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लावले आहेत आणि हे निर्बंध पुढील सहा महिने कायम राहणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे या निर्बंधांमुळे सदर बँकेच्या ग्राहकांना आपल्या खात्यातूनच पैसे काढता येणार नाहीयेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की आरबीआयचे देशातील तमाम सहकारी, सरकारी आणि खाजगी बँकांवर लक्ष असते. देशातील ज्या बँका नियमांचे पालन करत नाहीत अशा बँकांवर आरबीआय कडून कठोर कारवाई केली जात असते.
गेल्या काही महिन्यांच्या काळात आरबीआयने देशातील अनेक सरकारी, सहकारी तसेच खाजगी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच काही बँकांचे चक्क लायसन सुद्धा रद्द करण्याचा निर्णय आरबीआयकडून घेण्यात आला.
दरम्यान आता महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील लोकनेते आरडी आप्पा क्षीरसागर सहकारी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. ही बँक निफाड तालुक्यात कार्यरत असून या सहकारी बँकेवर झालेल्या कारवाईमुळे सदर बँकेच्या ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की या बँकेचे चेअरमन पद हे मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्याकडे आहे.
देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थात आरबीआयकडून सदर सहकारी बँकेच्या आर्थिक स्थितीचा मागवा घेण्यात आला होता आणि यानंतर आरबीआयने या सहकारी बँकेला कोणत्याही कर्जाचे नूतनीकरण करण्यास, निधीची उभारणी आणि नवीन ठेवी स्वीकारण्यासह कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास मनाई केली आहे.
आरबीआयच्या निर्बंधानुसार आता या सदर सहकारी बँकेला लेखी परवानगीशिवाय कोणतेही कर्ज मंजूर करता येणार नाही. नवीन ठेवी सुद्धा स्वीकारता येणार नाहीत. आपली कोणतीही मालमत्ता किंवा संपत्ती विकता येणार नाही.
ठेवीदाराच्या खात्यातून रक्कम काढण्याची परवानगी न देण्याचेही निर्देश यावेळी आरबीआय कडून देण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब अशी की हे निर्बंध पुढील सहा महिन्यांसाठी कायम राहणार आहेत.
सहा महिन्यानंतर आरबीआय कडून पुन्हा एकदा बँकेच्या आर्थिक स्थितीचा मागवा घेतला जाईल आणि त्यानंतर निर्बंध काढायचे की पुढे कायम ठेवायचे याबाबत निर्णय होईल. थोडक्यात जोपर्यंत बँकेची स्थिती सुधारत नाही तोपर्यंत आरबीआयचे निर्बंध कायम राहण्याचे चित्र आहे.