नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी असलेली कोल इंडिया ही सरकारी कंपनी वर्तमान आर्थिक वर्षात ७ हजार जणांना रोजगार देणार आहे. यंदा ही कंपनी तब्बल १७ टक्के अधिक रोजगार उपलब्ध करून देणार आहे.
दरवर्षी कंपनी सुमारे ६ हजार जणांना नोकरी देते. कोल इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आधुनिक, स्वयंचलित आणि पर्यावरणानुकूल खाणकाम सुरू असल्यामुळे कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे.
कोल इंडिया सध्या आपल्या २ हजार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत आहे. सरकारने कामगारांच्या पदोन्नतीमधील अडथळे दूर केले आहेत. कोल इंडियाच्या आठ सहयोगी कंपन्या आहेत. ही कंपनी दरवर्षी १ हजार अधिकाऱ्यांची नियुक्ती करते; पण यंदा ही कंपनी २ हजार नवे अधिकारी नियुक्त करणार आहे.
यापैकी ४०० जणांची नियुक्ती प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. या व्यतिरिक्त कंपनीतील २ हजार जणांना पदोन्नती देऊन अधिकारी स्तरावर आणण्याची कंपनीची योजना आहे. मागील तीन वर्षांपासून अशा नियुक्त्यांचे प्रमाण सरासरी ५ हजार आहे.
यंदादेखील सरासरी ५ हजार कामगारांची भरती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारवर विना रोजगार विकास असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
- Shukra Gochar 2024 : 7 जुलै रोजी चमकेल ‘या’ राशींचे नशीब, मिळेल मनासारखा जीवनसाथी!
- खा. निलेश लंके यांना आता थेट मंत्री गडकरींची साथ ! ‘रस्ता’ सूकर होणार, ‘हा’ मोठा शब्द
- Surya Gochar 2024 : 13 दिवसांनंतर सूर्य बदलेले आपला मार्ग, ‘या’ राशींच्या वाढतील अडचणी
- बहिणी संतापल्या, ‘लाडकी बहीण’ नियोजनाचा ‘खेळ’ ! महिलांच्या रांगा, विद्यार्थ्यांचेही हाल, काही ठिकाणी तलाठीच गायब
- पूर्वेकडून सुरवात झालीये त्यामुळे,.. अहमदनगरसह ‘या’ पाच जिल्ह्यात ‘इतका’ पडेल पाऊस, डॉ. पंजाबराव डख यांनी स्पष्टच सांगितलं..