श्रीगोंदा : यंदाचा गाळप हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवस राहिले असले तरी अजूनही मागील गाळप हंगामातील ऊस उत्पादकांचे पैसे साखर कारखान्यांनी दिलेले नाहीत. त्या कारखान्यांवर साखर आयुक्तांकडून जप्ती कारवाई करण्यात येत आहे.
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या संबंधित असलेल्या श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथील साईकृपा (१) खासगी कारखान्याने ऊस उत्पादकांचे देणे थकविलेले असल्याने या कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील आठ कारखान्यांवर जप्तीची कारवाई झालेली आहे. त्यातील पाच कारखान्यांनी ऊस उत्पादकांची सर्व थकित रक्कम दिलेली असून, तीन कारखान्यांकडे ‘एफआरपी’ची थकबाकी आहे.
त्यात पाचपुते यांच्या संबंधित दोन कारखाने आहेत. पाचपुते यांच्या संबंधित देवदैठण येथील साईकृपा खासगी कारखान्यावर ‘आरआरसी’ कारवाईचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.
याबाबतचा आदेश नगरच्या साखर सहसंचालक कार्यालयाला सोमवारी मिळाला आहे. साईकृपा (एक) या कारखान्याकडे ‘एफआरपी’ची ३ कोटी १ लाख ५६ हजार रुपयांची रक्कम थकित आहे. या कारवाईनुसार महसूल प्रशासन शिल्लक साखर व बगॅसची विक्रीतून वसुली करून ऊस उत्पादकांना देणार आहे.
- फक्त 333 रुपयांची गुंतवणूक बनवणार लखपती ; 1700000 रुपये मिळणार, कशी आहे नवीन योजना?
- नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात…! जानेवारी महिन्यात लॉन्च होणार 3 SUV कार, आतापासूनचं पैसा तयार ठेवा
- सावधान ! 2026 ‘या’ राशीच्या लोकांसाठी ठरणार कष्टाचे, बुध ग्रहाची केतूच्या नक्षत्रात होणार इंट्री
- Jio ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज प्लॅन लाँच ! 91 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 28 दिवसांची व्हॅलिडीटी
- शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रो प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! पुणेकरांची प्रतीक्षा वाढणार, मार्च 2026 ची डेडलाईन पण….