अंबाजी : गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात सोमवारी एक खासगी प्रवासी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात २१ ठार, तर ५० जण जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पंतप्रधानांनी या अपघातावर शोक व्यक्त केला.. बसमधील सर्वजण अंबाजी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. या बसमध्ये सुमारे ७० भाविक होते. दर्शनावरून परतत असताना अंबाजी-दांता मार्गावरील त्रिशुलिया घाटात ही ट्रॅव्हल्स उलटली. हा अपघात एवढा भीषण होता २१ जण जागीच ठार झाले. उर्वरित सर्व ५० जण जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावांतील गावकरी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने बस सरळ करून त्यामधून अडकलेल्या लोकांना बाहेर काढावे लागले. अपघातस्थळी रक्त, मांसाचा अक्षरश: सडा पडला होता. पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. या अपघाताचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही. पावसामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
- व्यवसायात सतत अपयश येतंय? वास्तुशास्त्रातील 7 चमत्कारी उपाय करून पाहा, लक्ष्मीच्या कृपेने तिजोरी पैशांनी गच्च भरेल!
- OnePlus यूजर्ससाठी आनंदाची बातमी! तब्बल 13 जुन्या मॉडेल्सला मिळणार नवीन OxygenOS 16 अपडेट; UI, गेमिंग, बॅटरी सगळं बदलणार
- शुक्रवार उपाय : देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी दर शुक्रवारी लावा तुपाचा दिवा आणि…; घरात येईल सुख-समृद्धी!
- 10 हजारांपेक्षाही कमी बजेटमध्ये विकत घ्या ब्रँडेड स्मार्ट टीव्ही, Amazon वर जबरदस्त टॉप-5 डील सुरू!
- ‘लाडकी बहीण योजने’तून तुमचं नाव काढलं तर नाही?, जून-जुलैचा हप्ता येण्याआधी ‘असं’ तपासा तुमचं नाव आहे की नाही!