अहमदनगर : मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या आदेशानुसार उपायुक्त प्रदीप पठारे यांनी एकूण १८ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी काढले असून त्यामध्ये नगररचना विभागातील ९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
यामध्ये गणेश क्यातम (पाणीपुरवठा विभाग), सतिष दारकुंडे (घनकचरा व्यवस्थापन विभाग), श्रीकांत दरेकर (प्रभाग समिती क्रमांक १), किशोर जाधव (स्थानिक संस्था कर), प्रविण नेमाणे (सामान्य प्रशासन विभाग), सुधीर सुळ (प्रभाग समिती क्रमांक ४), जितेंद्र सासवडकर (प्रसिद्धी विभाग), संजय चव्हाण (प्रभाग समिती क्रमांक ४), अंकुश कोतकर (प्रभाग समिती क्रमांक ४) यांचा समावेश आहे.

पाणीपुरवठा विभागातील कन्हैय्या छप्पानिया, प्रसिद्धी विभागातील राजाराम मोरे, घनकचरा व्यवस्थापन विभागातील नितीन गोरे, प्रभाग समिती क्रमांक १ चे सुनिल खलचे, प्रभाग समिती क्रमांक ४ चे कृष्णा साळवे, दिनेश बारनौक, स्थानिक संस्था करचे राजेश लवांडे, सामान्य प्रशासन विभागातील दत्तात्रय ढवळे, प्रभाग समिती क्रमांक ३ मधील राजेंद्र खडतरे या ९ जणांची नगररचना विभागात बदली करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना तातडीने पुर्वीच्या विभागातून कार्यमुक्त करत नवीन विभागात रुजू होवून कामकाज पाहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात, कोणत्या टाळाव्यात? निरोगी आरोग्यासाठी वाचा या टिप्स!
- घरात ‘ही’ वनस्पती चुकूनही लावू नका, वास्तुशास्त्र सांगतं या वनस्पतीमुळे नशिबावर होतो परिणाम!
- चंदनच नाही तर भारतातील 99% लोकांच्या घरापुढील ‘ही’ 2 झाडे सापांना देतात आयत निमंत्रण !
- रेल्वे तिकीटाने फक्त प्रवासच नाही तर ‘हे’ 5 फायदेही मिळतात; 90% लोकांना माहीत नसतील IRCTC च्या मोफत सुविधा!
- इंटरनेटशिवाय चेक करा PF खात्यातील बॅलन्स; SMS, मिस्ड कॉल आणि WhatsApp ट्रिक जाणून घ्या!