नगर : आज माजी खासदार आणि माजी आमदार यांच्या मध्ये मनोमिलन झाले. आमच्यातली कटुता ही पेल्यातील वादळ होती असे त्यांनी सांगितले. अशाच प्रकारचे मनोमिलन या दोघांमध्ये नगर शहराच्या विकासासाठी झाले असते तर शहरातील मतदारांना आनंद झाला असता.
मात्र केवळ तीन दिवसावर येऊन ठेपलेली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यांच्यामध्ये झालेल्या मनोमिलन यामुळे मतदारांमध्ये काहीही फरक पडणार नसून वंचित बहुजन आघाडी शिवसेना उमेदवाराच्या निश्चित पराभव करेल, असा विश्वास उमेदवार किरण काळे यांनी व्यक्त केला आहे.
नगर शहराचा उड्डाणपुलाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. हा प्रश्न विशेषत: खासदार यांच्या अखत्यारीत येतो. राज्यात आणि केंद्रात युतीची सत्ता होती. माजी आमदार आणि माजी खासदार या दोघांनी मिळून ताकद लावली असती तर निश्चित हा प्रश्न मार्गी लावू शकले असते.
परंतु केवळ निवडणुकीपुरते राजकीय तडजोड करणे यातच धन्यता मानणारे या शहराचा काय विकास करणार असा सवाल काळे यांनी केला आहे. त्यामुळेच आता अशा प्रकारच्या मनोमीलनामध्ये सामान्य मतदारांना कोणताही रस नसल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
वंचितच्या जाहीर नाम्यात सांगितल्या प्रमाणे निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत आपणच उड्डाण पुलाचे काम पूर्ण करून नगरकरांना विकास काय असतो हे दाखवून देऊ असे काळे यांनी म्हटले आहे.
- Supreme Court Decision: ‘स्त्रीधन’ ही पूर्णतः पत्नीची मालमत्ता, त्यावर पतीचा कुठलाही प्रकारचा नसणारा अधिकार! सुप्रीम कोर्टने दिला महत्वपूर्ण निर्णय
- तुम्हाला माहित आहे का की उत्तीर्ण होण्यासाठी किमान 33% का आवश्यक असतात? वाचा यामागील महत्वाचे कारण
- व्यक्तीच्या पायाची बोटे सांगतात त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे आहे? वाचा पायाच्या बोटांवरून एखाद्या व्यक्तीची जीवनशैली कशी ओळखाल?
- Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेल्या मुली घराच्या प्रगतीसाठी असतात महत्त्वाच्या आणि पतीला देतात प्रत्येक पावलावर साथ! वाचा माहिती
- Railway Ticket Booking: तिकीट एजंटकडून रेल्वेचे कन्फर्म तिकीट बुक करत आहात का? जरा थांबा,नाहीतर होऊ शकतो मनस्ताप