नगर : आज माजी खासदार आणि माजी आमदार यांच्या मध्ये मनोमिलन झाले. आमच्यातली कटुता ही पेल्यातील वादळ होती असे त्यांनी सांगितले. अशाच प्रकारचे मनोमिलन या दोघांमध्ये नगर शहराच्या विकासासाठी झाले असते तर शहरातील मतदारांना आनंद झाला असता.
मात्र केवळ तीन दिवसावर येऊन ठेपलेली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यांच्यामध्ये झालेल्या मनोमिलन यामुळे मतदारांमध्ये काहीही फरक पडणार नसून वंचित बहुजन आघाडी शिवसेना उमेदवाराच्या निश्चित पराभव करेल, असा विश्वास उमेदवार किरण काळे यांनी व्यक्त केला आहे.

नगर शहराचा उड्डाणपुलाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. हा प्रश्न विशेषत: खासदार यांच्या अखत्यारीत येतो. राज्यात आणि केंद्रात युतीची सत्ता होती. माजी आमदार आणि माजी खासदार या दोघांनी मिळून ताकद लावली असती तर निश्चित हा प्रश्न मार्गी लावू शकले असते.
परंतु केवळ निवडणुकीपुरते राजकीय तडजोड करणे यातच धन्यता मानणारे या शहराचा काय विकास करणार असा सवाल काळे यांनी केला आहे. त्यामुळेच आता अशा प्रकारच्या मनोमीलनामध्ये सामान्य मतदारांना कोणताही रस नसल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
वंचितच्या जाहीर नाम्यात सांगितल्या प्रमाणे निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत आपणच उड्डाण पुलाचे काम पूर्ण करून नगरकरांना विकास काय असतो हे दाखवून देऊ असे काळे यांनी म्हटले आहे.
- अहिल्यानगरमध्ये १६६९ क्विंटल भाजीपाल्याची आवक, गवारीला १२ हजार रुपयांपर्यंत भाव
- अहिल्यानगर बाजार समितीत फळांची आवक घटली, मात्र डाळिंबाच्या भावात मोठी वाढ, प्रतिक्विंटल मिळतोय एवढा भाव?
- पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय ! मुंबईवरून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन
- अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ ८१ गावात आढळले दूषित पाणी, आजारांचा धोका वाढला
- पालकांनो, मुलांना स्कुलबसमधून शाळेत पाठवताय? तर खबरदारी घ्या अन् स्कुलबसचं ‘हे’ प्रमाणपत्र नक्की तपासून पहा!