श्रीरामपूर- श्रीरामपूरमधील भाजपाचे नेते प्रकाश चित्ते यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी दिपाली व मुलगा प्रतिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली.
या भेटीत संपूर्ण घटनाक्रमाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले की, संबंधित फिर्यादीने रात्री पावणेआठ वाजता दिलेल्या एनसीमध्ये ना प्रकाश चित्ते यांचे नाव होते, ना जातीयवाचक शब्दांचा उल्लेख होता. मात्र, त्यानंतर रात्री एक वाजता पुन्हा नव्याने दाखल करण्यात आलेल्या दुसऱ्या फिर्यादीत, जातीय शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कुठलीही प्राथमिक चौकशी किंवा शहानिशा न करता तातडीने अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारातून प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचा आम्हाला संशय येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष प्रकरणाची वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी निवेदनात केली आहे.