शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी तसेच कृषीमंत्र्याचा राजीनामा घ्यावा, जामखेड तालुक्यात प्रहार संघटनेचा रास्तारोको

Published on -

जामखेड- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल, असे वचन दिले होते. परंतु सरकार स्थापन होऊन बराच काळ झाला असतानाही अद्यापही राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी बाबत ठोस निर्णय झालेला नाही.

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर, विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मोबाईलवर ऑनलाइन खेळत असल्याचे सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. वर्तनामुळे केवळ शेतकऱ्यांचा अपमान झाला नाही, तर संपूर्ण लोकशाही प्रक्रियेलाही धक्का पोहोचला आहे. त्यामुळे त्यांचा त्यांच्या अशा राजीनामा द्यावा व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या अश्वासनांनुसार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार पक्षाच्या वतीने दि. २४ जुलै रोजी संपुर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यानुसार जामखेड येथील खर्डा चौकात पक्षाचे तालुका अध्यक्ष नय्युम सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

या रास्तारोको आंदोलनास जामखेड तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, आमआदमी पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना उ.बा.ठा. या पक्षांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपला पाठिंबा दिला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. डॉ. अरुण जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल लोंढे, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष प्रा. कुंडल राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, सामाजिक कार्यकर्ते मंगेश आजबे, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास मासाळ, शिवसेना उ.बा. ठा. तालुकाध्यक्ष अॅड. मयुर डोके, प्रमोद खोटे आदि पदाधिकाऱ्यांसह, डॉ. प्रकाश कारंडे, वसिम सय्यद, गणेश हागवणे, रामहरी जायभाय, सामाजिक कार्यकर्ते उमरभाई कुरेशी, चित्रांगण वारे, भुजंग जायभाय सुनिल केकान, हनुमान उगले, गणेश उगले, युवराज उगले, नितीन ससाणे, विजय काशिद, भारत पवार, चत्रभुज वारे, बंडू उगले, सागर कोल्हे, जनार्धन भोंडवे संजय मोरे, सोहेल तांबोळी आदिसह शेतकरी व विविध पक्षसंघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन देऊन अंदोलनाचा समारोप करण्यात आला. रास्तारोको अंदोलनाच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!