श्रीरामपुरमध्ये वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडीत,महावितरणचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष? तब्बल २८ तासांनी वीजपुरवठा केला सुरळीत

बाभळेश्वर परिसरात वादळी वाऱ्यामुळे वीज पोल कोसळून श्रीरामपूर तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाला. शहरात सकाळीच वीज आली, मात्र ग्रामीण भागात २८ तासांनी वीज मिळाल्याने नागरिकांमध्ये महावितरणविरोधात तीव्र नाराजी व्यक्त झाली.

Published on -

Ahilyanagar News: श्रीरामपूर- शनिवारी बाभळेश्वर येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी महावितरणचे पोलही पडले.परिणामी बाभळेश्वर सबस्टेशनहून होणारा वीज पुरवठा खंडित झाला.

नागरिकांना त्रास

श्रीरामपूर शहर व ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्रभर त्रास सहन करावा लागला. युद्ध पातळीवर पोल उभे करून श्रीरामपूर शहराला वीज पुरवठा सकाळी ११ वाजता सुरु झाला.

पाण्यावाचून हाल

मात्र ग्रामीण भागात वीजपुरवठा उशीरापर्यंत सुरू झाला नसल्याने माणसांसह जनावरांचेही पाण्यावाचून हाल झाले. हरिगाव परिसरात दुपारी दोन वाजताच वीजपुरवठा सुरू झाला. परंतु शिरसगाव, सूतगिरणीसह तालुक्याच्या इतर भागात मात्र २८ तासंनंतर रात्री ७.३० वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला.

व्यवस्थित वीजपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी

त्यामुळे महावितरणच्या या दुजाभावामुळे ग्रामीण भागात नाराजी पसरली. पावसामुळे अथवा वादळामुळे यापुढे असा दुजाभाव न करता सर्वांचाच विचार करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News