बाळासाहेब थोरातांच्या पत्राची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंनी घेतली तात्काळ दखल, निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्यातून सोडले पाणी

Published on -

संगमनेर- निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी सोडावे, अशी मागणी केल्यानंतर काल प्रशासनाच्या वतीने डाव्या व उजव्या दोन्ही कालव्यांना पाणी सोडल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दोन्ही धरणांमध्ये पाण्याची चांगली आवक झाली. हे पाणी नदीतून अगदी शेवटपर्यंत पोहोचले. पाणलोट क्षेत्रात पाऊस असताना धरणाच्या लाभ क्षेत्रात मात्र, पाऊस अत्यंत कमी पडत आहे. पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

आणि म्हणून वाहून जाणारे पाणी हे उजव्या व डाव्या कालव्याने सोडावे, त्यातून बांधारे नाला बिल्डिग भरून घेता येतील आणि या परिसरात शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. त्यामुळे तातडीने दोन्ही कालव्यांमधून पाणी सोडावे, अशी मागणी निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहून केली होती.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यातील शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारे नेते आहेत. त्यांनी केलेल्या मागणीनंतर जलसंपदा विभाग व मंत्री विखे पाटील यांनी पाणी सोडण्याचे आश्वासित केले होते. त्यानुसार आज निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून ३०० हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले असून पुढे हे पाणी वाढवण्यात येणार आहे.

सध्या संगमनेर तालुक्यासह धरणाच्या लाभक्षेत्रात अत्यंत कमी पाऊस असल्याने निळवंडेच्या डाव्या व उजव्या कालव्यातून आलेल्या पाण्याने अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, राहुरी, सिन्नर, या तालुक्यामधील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालवे १८२ गावांकरीता पूर्ण केले असून या गावांच्या अडचणी, शेतकऱ्यांचे प्रश्न या भागात झालेला कमी पाऊस याची पूर्ण माहिती त्यांना असून त्यांनी कायम शेतकऱ्यांच्य हिताची भूमिका घेतली आहे. राजकारण विरहित शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहणारे ते नेते असल्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण सांगळे यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!