Ahmednagar News : सन १९७५ ते २०२३ या दरम्यान वेगवेगळया गुन्ह्यातील जप्त वाहने व बेवारस वाहनांचा शासकीय पद्धतीने लिलाव होणार आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पंधरा दिवसाच्या आत ओळख पटवून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यात पडून असलेल्या १६० दुचाकी वाहनांची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून पडताळणी व मूल्यांकन करण्यात आले आहे. वाहनांचे लिलाव होणार असल्याचे उद्घोषणापत्र १५ सप्टेंबर २०२३ रोजी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी प्रसिद्ध केली आहे.

त्यानुसार येत्या पंधरा दिवसांत १६० दुचाकी वाहनांचा शासकीय नियमानुसार तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांचे परवानगीने लिलाव करून येणारी रक्कम शासन जमा करण्यात येईल.
नागरिकांनी पोलिस हेड कॉन्स्टेबल शेख तनवीर व दिपक साबळे यांच्याशी संपर्क करावा. यापूर्वी सुध्दा वाहने घेऊन जाण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. १२५ पेक्षा जास्त वाहने मूळ मालकांना परत करण्यात आली आहेत.