अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी इकडे लक्ष द्या ! कर्जदारांना ३ लाख पिक कर्जापर्यंत शुन्य टक्के व्याज दराचा फायदा

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांची दि.३०/६/२०१६ च्या पूर्वी थकबाकीदार सभासदांकरीता जिल्हा बँकेने एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२३ अंमलात आणली असुन,

या योजनेचा थकबाकीदार शेतकऱ्यांनी फायदा घेण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी केले. ते विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या सचिवांच्या आढावा बैठकीत बोलत होते. पुढे म्हणाले की,

शेतकऱ्यांनी या योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून लाभ घ्यावा. लाभ घेणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांना जिल्हा बँक त्वरीत नियमित पिक कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

त्यामुळे सदर शेतकरी नियमित कर्जदार होत असल्याने सदर कर्जदारांना ३ लाख पिक कर्जापर्यंत शुन्य टक्के व्याज दराचा फायदा होणार आहे. असे सांगुन ते पुढे म्हणाले की, पिक कर्ज अथवा इतर कर्ज नियमित परतफेड न केल्यास शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड बसतो.

थकीत पिक कर्जाला ११% च्यावर व्याजदर आकारणी होत असते. त्यामुळे कर्जदार शेतकऱ्यांनी आपले कर्ज वेळेत भरण्याचे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी अहमदनगर जिल्हयाचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी केंद्र सरकारच्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांसाठी विविध व्यवसायांकरीता राबवणाऱ्या योजनांची माहीती देवन सोसायटयांनी आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरीता या योजनेत सहभागी होणेबाबत सांगीतले.

अहमदनगर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्षे यांनी वसुली, ठेवी वाढीबाबत मार्गदर्शन केले व सेवा सोसायटीने केंद्र शासीत संगणकीकरण योजनेत अग्रेसिव्ह काम करून आपल्या सेवा सोसायट्या लवकरात लवकर केंद्र शासीत संगणकीकरण योजनेत संस्था संगणकीकरण करून घेण्याबाबत सुचना केल्या.

या प्रसंगी बँकेचे संचालक माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, सिताराम पाटील गायकर, माजी आ. राहुल जगताप, अंबादास पिसाळ, अमोल राळेभात, करण ससाणे, असिस्टंट रजिस्टार, देवीदास घोडेचोर आदीसह बँकेचे वरीष्ठ अधिकारी तसेच तालुका विकास अधिकारी, जिल्हयातील सचिव उपस्थित होते. आभार सरव्यवस्थापक जयंत देशमुख यांनी मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe