वैभव नायकोडी खून प्रकरणातील मोठी अपडेट ! पोलिसांनी केली आणखी एका आरोपीला अटक

Published on -

अहिल्यानगरमध्ये बहुचर्चित असलेल्या केकताई जंगल खून प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल बंडू पाटोळे (वय १९, रा. चेतना कॉलनी, एमआयडीसी) याला रविवारी पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

तो गेल्या पंधरा दिवसांपासून फरार होता आणि पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर तोफखाना पोलिसांनी मोठ्या नियोजनानंतर त्याला ताब्यात घेतले आहे.

वैभव शिवाजी नायकोडी (रा. ढवणवस्ती, नगर) याचा खून करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी राहुल पाटोळे सतत पोलिसांना चकवा देत होता. पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक त्याच्या मागावर होते.

रविवारी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी राहुल पाटोळे नगर शहरातील जिमखाना मैदान, एमआयडीसी येथे येणार आहे. त्यानंतर पोलिस निरीक्षक कोकरे यांनी त्यांच्या टीमला आवश्यक निर्देश दिले आणि आरोपीला पकडण्यासाठी ठिकाणी सापळा रचण्यात आला.

सापळा रचल्यानंतर पोलिसांना आरोपीच्या हालचालींची खात्री झाली. तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला जेरबंद केले.

या यशस्वी कारवाईत पोलिस निरीक्षक आनंद कोकरे, पोलिस उपनिरीक्षक शैलेश पाटील, हेडकॉन्स्टेबल सुनील शिरसाठ, सुनील चव्हाण, योगेश चव्हाण, सुधीर खाडे, सूरज वाबळे, कॉन्स्टेबल सतीष त्रिभुवन, बाळासाहेब भापसे, सतीष भवर, सुजय हिवाळे, महेश पाखरे यांनी मोलाची भूमिका बजावली.

राहुल पाटोळेला पुढील तपासासाठी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या खून प्रकरणातील इतर कोणतेही आरोपी असल्यास त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाणार आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या अटकेमुळे दिलासा निर्माण झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe